tag:blogger.com,1999:blog-10869434072085026062024-03-08T16:15:39.197-06:00मैफिलUnknownnoreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-60157911451334866842011-07-07T08:40:00.001-05:002011-07-07T08:44:45.454-05:00हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ!भालचंद्ररावांनी हिंदूच्या मुलाखती द्यायला सुरूवात केल्यापासून हिंदू एकदम (प्रसिद्धी पूर्व) प्रकाशझोतात आली. आम्हास हिंदू वाचावी की नाही ह्याची चिंता लागलेली असतानाच विविध मान्यवर वाचकांनी व आम्हा सारख्या स्वघोषीत समिक्षकांनी हिंदू बद्दल भरपूर उलटसुलट लिहिले. आता उलटसुलट लिहिणे हे क्रमप्राप्तच आहे, काय करणार शीर्षकच हिंदू! उत्सायात्साते आम्ही हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ६५० रू वजा टिच्चून १५ टक्के डिस्काउंट घेऊन मिळवली. आणि आम्ही बॅक टू द फ्युचर (की पास्ट? ) राईडीस तयार झालो.<br /><br />हिंदू सुरू होते तीच मुळी मोठ्या स्वगतांतूनच. त्यातून आम्हास कळले ही खंडेराव नावाच्या कुण्या व्यक्तीची ही कहाणी. तो जातीने (आता हिंदू म्हणले की जात आली हे ओघानेच, ती द्विरुक्ती टाळून आम्ही जातच म्हणणार) कुणबी. मोप शेती बिती असलेला पण शेती करायची इच्छा नसलेला. खंडेराव घरातून श्रीमंत! अठरा प्रहर त्याचा खरी माणसांची ये-जा. पण गड्याला शिक्षणाची आवड. तो मोरगाव नावाच्या गावी राहतो, शिकतो, पूढे औरंगाबादेस येतो अन तिथे उच्चविद्याविभूषित होतो पण तरीही मनाने स्थिर नसतो. जाती व्यवस्था, पॉलीटिक्स, शेती की शिक्षण, घरची नाती आणि भारताचा पुरातत्त्व इतिहास हा सर्व गोंधळ त्याचा मनात कायम धुडगूस घालत असतो. त्यातच तो अचानक हिंदू संयुक्त कुटूंबाचा कुटुंबप्रमुखच होतो. मी जरा पुढेच गेलो. अन चार ओळीत हिंदूची कथाच सांगीतली नाही का? पण मग पास्टचे काय? तर ही कादंबरी वर्तमानातून भूत व परत वर्तमान अशी फ्लॅशब्याक स्वरूपात येते.<br /><br />खंडेराव हा पुरातत्त्व विषयात पि एच डी करत असतो. आता पुरातत्त्व आले की आपण हडप्पा, मोहंजो-दाडो बद्दल बोलणार ही तुम्ही ताडले असेलच. अगदी तेच. उत्खननासाठी तो मोहंजो-दाडोला गेलेला असतो, तिथे त्याला वडील मरायला टेकले असल्याची तार येते आणि त्याचा सिंधू संस्कृती पासून परत मोरगावाकडे प्रवास चालू होतो. पाकिस्तान ते भारतातील मोरगाव एवढा मोठा प्रवास, त्यातच वडील आजारी म्हणजे वेळ जाता जाणार नाही, त्या प्रवासात त्याला आपले लहाणपण, भावंड, घरची माणसं, नाती-गोती, आला-गेला, बाराबलूतेदार, चिमणी-पाखरं, मोत्या-मुत्या, झीबू-ढबू , महार-मांग, पेंढारी-लभाने, होळकर-पेशवे, वेशीमधले-वेशीबाहेरचे, मराठा-कुणबी, वैदू-ब्राम्हण, तिरोनी आत्या ते चिंधी आत्या, मोरगाव ते औरंगाबाद, शेती ते पुरातत्त्वखाते, सिंधूसंस्कृती ते आजचे हिंदू हे सर्व आलटून पालटून त्याचा मनात पिंगा घालत असतात. पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा!! त्याचे मन हे असे धाव घेत असताना आम्ही त्यासोबत खंडेरावाचा प्रवास करत होतो. त्याच्या विचारातून मोरगाव सतत डोकावत राहते. त्याचे विचार केवळ शेती पुरते मर्यादित नसून ते विविध विषयांना स्पर्श करत असतात. उदाहरणार्थ तुलनेने अशिक्षित असलेल्या जातींमधील लैंगिक स्वातंत्र्य असो की भारतातील अनेक जमातींमधील स्त्रियांचे सामाजिक स्थिती, त्याची चिंधी आत्या नवर्याचा खून करते तो प्रसंग फारच मस्त उतरला आहे. चिंधी आत्याची घुसमट ही अनेक स्त्रियांच्या घुसमटीची प्रतिनिधित्व करते तर गावात असलेली लभानी वेश्या ही मुक्त असणार्या समाजाचे प्रतिनिधित्व करते. महार-मांग कुणब्याच्या शेतात काम करणारा भाग असो की विठ्ठलरावांनी गावाच्या उचापती सोडवण्याकरता केलेले लष्कराच्या भाकर्या भाजण्याचे काम असो, प्रत्येकाशी वाचक (खेड्यात न राहताही) रिलेट होऊ शकतो. आणि त्यामुळेच कदाचित हिंदू ह्या शब्दाचे प्रयोजन! ग्रामीण भागातील रुढी परंपरा व एकमेकांमध्ये गुंतलेली समाजाची अर्थव्यवस्था नेमाडे बर्यापैकी ताकदीने उभी करतात. बर्यापैकी लिहिण्याचं कारण बरेचदा पाल्हाळ लावले आहे, ते टाळता येते.<br /><br />नेमाडे आपल्या त्याच त्या शैलीतून बाहेर येत नाहीत हे कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवत राहते. उदाहरणार्थ<br />खंडेरावाचे व्यक्तीचे इंटर पर्सनल स्किल्स थेट आपल्या पांडुरंग सांगवीकरासारखे. आता हा पांडू कोण? हा प्रश्न तुम्हास पडला असेल. अहो पांडू म्हणजे आपला पिसपीओ. पांडूसारखेच खंडेरावास घरातल्या माणसाची घृणा (अपवाद त्याचा भाव भावडू) आई वडिलांबरोबर संबंध चांगले नाहीत, आई वडील पांडू सारखेच त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात पण बंड करून खंडेराव आपले इत्सिप्त साध्य करतो, त्या घडामोडी थेट कोसलाच्याच, ते कारेपण, मनाशीच चाललेली कुस्ती ह्याची तुलना वाचक नकळत कोसलाशी करतो. नेमाड्यांनी खंडेरावाचे कॅरेक्टर पांड्यावरून उचलले असल्याचे जाणवत राहते. पण थोडे वेगळे व्हर्जन. हो आता मारूती ८०० देखील इतक्या वर्षांनंतर कात टाकते, तर पांडू टाकणारच. पांड्याचे जाऊद्या तुम्हाला चांगंदेव माहित आहे का? औरंगाबादेतील बरीचशी घालमेल त्या चांगदेवासारखी. शिक्षणाची व शिक्षण संस्थांची ऐशी तैशी करणारे शिक्षण महर्षी व पॉलीटिक्स व एकूणच विद्यापीठातील भानगडी हे सर्व परत थेट चांगदेवासारखेच. फक्त तेवढे पाल्हाळ लावले नाही. तरी औरंगाबाद प्रकरणात १०० एक पाने खर्ची घातले आहेतच. आम्हास नंतर असे वाटले की पांडुरंगाच्या अस्वस्थपणात त्याच्या घरचे लोकं दिसत नाहीत, ते ओघाने पांडुरंगाचे कॅरेक्टर बिल्डींग साठीच येऊन जातात पण खंडेरावाच्या वेळी मात्र घरच्यांची सांगड घालून त्यात गावाची, गावकी-भावकीची भर टाकली आणि चांगदेवाच्या प्राध्यापकी, शिक्षकीपेशाची, हॉस्टेलच्या वातावरणाची फोडणी दिली की झाला खंडेराव अन पर्यायाने हिंदू तयार. चटणी म्हणून केवळ पुरातत्त्व येते. खरे तर नाव वाचून आम्ही हिंदू कडून खूप अपेक्षा वगैरे करून बसलो पण भलताच अपेक्षाभंग झाला.<br /><br />खंडेराव हे नाव हिंदू, सिंधू संस्कृती हिंदू म्हणून हे नाव हिंदू. खंडेरावासारखाच कोणी इस्माईल खान असला असता तर कदाचित इस्लाम जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव आले असते असे प्रथमदर्शनी वाटणे साहजिक आहे. आणि खरेतर कुण्या एका अमेरिकन बॉबची कथा जरी अशीच वाटली तर ती अमेरिकन, जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव कोणी ठेवले तर वावगे नाही. तसेच पुस्तक प्रसिद्धी पूर्व चर्चेत हिंदू नावामुळे आले व त्यातच लेखक नेमाडे मग काय! मुलाखतीतून नेमाडे हिंदू धर्माबद्दल अनेकदा बोलले, रुढी परंपरांवर ताशेरे वगैरे ओढले, काही माहिती दिली जसे कृष्ण तीन होते वगैरे. आम्हास कादंबरी वाचून असे कळाले की हे सर्व त्या प्रसिद्धीसाठी ! कादंबरीत काही वेगळेच येते. कारण आम्ही तीन कृष्णांची कथा कधी येते ह्या उत्साहात्साते वाचत गेलो, पण किशन्या गावलाच नाही! वर तर वर खंड्याच मध्ये मध्ये बोअर मारू लागला.<br /><br />त्यातल्या त्यात चांगली बाब अशी खंडेराव नुसतेच पाल्हाळ लावत नाही, पाल्हाळात कधी कधी समृद्ध बोलतो उदा " अशा रितीनं श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न स्वायत्त कृषी संस्कृती परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्या नागरी, ऐतखाऊ औद्योगीक व्यापारी संस्थेची भरभराट झाली" हे वाक्य आजच्या भारतीय कृषी व्यवस्थेला अगदी लागू होतं. किंवा " आपला देश परदेश तर परदेश देश आपला" ही एखाद्या पुरातत्त्व चित्रा वरील खून उलटी किंवा सुटली वाचल्यावर येणारी गंमत आणि त्याचा गंभीर अर्थ किंवा प्रत्येक भारतातील प्रत्येक जातीचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य वगैरे वगैरे.<br /><br />खंडेरावाला नुसत्या मुद्रा संशोधनात रस नाही तर त्याला त्या पाठी मागे असलेल्या मानवी विचारांच्या बद्दल संशोधन करायचे असते. जाणिवांच्या उत्क्रांती बद्दल खंडेराव बोलत राहतो. पण त्याचे गाईड त्याला तसे करता येत नाही असे सांगतात. सध्या पाश्चात्यांची इतिहासावर मालकी आहे, इतिहासात बंडल चालतात, पुरातत्त्व हे अस्सल. मडक्यावरच्या आकृत्या, मोंहजोदाडोला सापडलेल्या मूर्ती हेच खरे, तिथे बदल नाही आणि तेच खरे, तोच संस्कृतीचा पुरावा, असे त्याचे सर त्यास सांगू पाहतात पण खंडेरावास जाणिवांच्या उत्क्रातींवर काम करावे वाटते. आधी मातृसत्ता, पितृसत्ता नंत्तर कुटूंब, समाज, धर्म, विज्ञान पुढे काय? हे प्रश्न त्याला पडत राहतात.<br /><br />कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व ते उत्तर असा विभागलेला आहे. पुढे कादंबरीत युरिया, बियाणे ह्यामुळे झालेली हरितक्रांती देखील मोहंजोदाडोच्या जोडीला येऊन बसते. त्यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरण पण आणतात. खंडेरावास गझल प्रकार आवडतो. गालिब, मिर असे सिद्धहस्त शायर व त्यांचे शेर तो मध्ये मध्ये आपल्याला सांगतो. त्याचे रूम पार्टनर चौघे चार जातीचे, त्यांच्या लकबी, विचार मध्येच येतात. पूर्ण कादंबरीच आठवेल तसे लिहिणे, असा बाज नेमाड्यांनी ठेवला आहे. तो कधी कधी बराही वाटतो. काही काही ठिकाणी अशक्य विनोद निर्मितीही आहे.<br /><br />एकूणच ही कादंबरी मराठी साहित्यातील अडगळ ठरते की काय आहे असे आमचे मत झाले. आता ती समृद्ध अडगळ आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकास पडणे साहजिक आहे. आम्हास विचारले तर हो जर ती पूर्ण कादंबरी एकुण ३ एकशे पानांचीच असली असती तर कदाचित समृद्ध ठरलीही असती, पण खंडेरावाचे पाल्हाळ कधीकधी वाचायला बोअर होते अन ती त्या कादंबरीतील अडगळ नेमाडे दुर करू शकले नाहीत. बाराबलूतेदार, कुणबी मराठा, स्वायत्त ग्रामव्यवस्था, आणि हजारो वर्षे चालत आलेल्या संस्कृतीमुळे निर्माण झालेल्या काही रूढी परंपरा ह्याचा आढावा नेमाडे घेतात. एकूण त्यांच्या लिखाणातून. 'हे जे काही कडबोळं आहे ते अगदीच वाईट नाही, थोडा धुळ झटकली तर फरक पडेल' असा सूर दिसतो.<br /><br />तुम्ही म्हणाल की नक्की आम्ही काय समीक्षण केले? कादंबरी घ्यावी की नाही? गोची तीच तर आहे. हिंदू कादंबरी चांगली आहे, पण ती आमच्या अपेक्षेला (जी खुद्द नेमाड्यांनी अनेक मुलाखती देऊन वाढवून ठेवली) उतरत नाही. काही भाग खरचं चांगला उतरला आहे, पण पुनरुक्तिचा दोष स्विकारून पाल्हाळ लावले आहे हे आम्ही इथे सांगू इच्छितो.<br /><br />प्रश्न उरतो मग आम्ही समीक्षण का केलं? सोपं आहे. अडगळ वाढवण्यासाठी! हे समीक्षण आणि ती कादंबरी समृद्ध आहे की अडगळ हे तुम्हीच ठरवा.Unknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-86855751599487889792009-02-19T13:49:00.003-06:002009-02-19T13:54:52.456-06:00देवा तुझ्या दारी आलोये देवा तुझ्या दारी आलो<br /><span class=""></span>गुणगान गाया<br />तुझ्याइना माणसाचा<br />जन्म जाई वाया<br /><br />ऐ देवा दिली हाक<br />उद्धार कराया,<br />आभाळाची छाया तुझी<br />समिंदराची माया<br /><br />मोरया मोरया मोरया मोरया<br />मोरया मोरया मोरया मोरया <br />वीर रसातील संगीत आणि आर्त आवाज. क्या कहने. अनुभूती अनुभूती म्हणतात ती हिच का?<br /><br />[video:<a href="http://www.youtube.com/watch?v=IOmh7kUnirw">http://www.youtube.com/watch?v=IOmh7kUnirw</a>]Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-50106309563211857682009-02-01T11:06:00.003-06:002009-02-01T11:16:28.878-06:00मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई"दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी<br />ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली<br />ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते<br />खचो लागली तेवि मते कुराणेही खंडली<br />रामराणी भद्रकाली रणरंगी कृद्ध झाली<br />प्रलायाची वेळ आली मुगलहो सांभाळा "<br /><br /><br />कवि गोविंद<br />मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक विधवा बाई, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देन्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते.<br />मराठी स्वराज्याचे शिवाजी महाराजांनंतर तिन स्वतंत्र कालखंड आहेत. प्रत्येक कालखंडाला एक विशिष्ट महत्व आहे. येनारा प्रत्येक राजा वा राणी हे एका वेगळ्याच लढ्यातुन गेलेले आहेत. त्यांचा लढ्यातुन महाराष्ट्र तावुन सुलाखुन निघाला. प्रत्येक पुढार्याने ( संभाजी, राजाराम, ताराबाई ) अनेक कर्त्तत्ववान पुरुषांना निर्मान केले आहे. हा काळच मोठ्या धामधुमीचा होता. छत्रपती संभाजींनी औरंगजेबाला थोपवुन धरले त्यामुळे संभाजीच्या काळात औरंगजेबाला मराठा राज्य सोडुन विजापुर व गोवळकोंडा राज्य घ्यावे लागले. राजारामचा कालावधी आपण गेल्या लेखात पाहीला. आज ह्या भद्रकालीचा कालखंड पाहु.<br /><br />मराठेशाही सन १७०० ते १७०७<br /><br />भद्रकाली खरी कोपली होती ती राजाराम ह्ययात असतानाच. पति जिंवत असतना ही बाई स्वतंत्र मोहीमा चालवायची व मोगलांना सळो की पळो करुन सोडायची. मोगली सरदार खाफीखानाने औरगंजेबाला एक पत्र लिहीले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा असा " ताराबाई ही राजारामाची थोरली बायको आहे. ती बुध्दीमान आणि शहानी आहे. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवर्याच्या ह्ययातीतच तिचा लौकीक झाला आहे."<br />राजारामाच्या मृत्यू नंतर ताराबाईने आपल्या सावत्र मुलाला संभाजीला गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच असल्यामुळे सर्व सरदार, हुकुमत्पन्हा, प्रतिनिधी हे तीचा सल्ला घेऊन चालायचे. गेली १८ वर्षे ( संभाजी गादीवर आल्या पासुन) सतत चालनारा मोगली, विजापुरी संघर्ष मराठ्यांचा जणू अंगीच पडला होता. १७०० ते १७०७ या कालखंडात शेकड्याने लढाया मराठी भुमीवर झाल्या पण त्याला समर्थपणे तोंड देऊन ताराबाईने राज्य जिंवत ठेवले ईतकेच नाही तर वाढविले सुध्दा.<br />राजाराम जायच्या आधीच मोगलांनी सातार्याला वेढा घातला होता. सात्यार्यासोबत पन्हाळा, विशाळगड, पावनगड अश्या अनेक गडांवर वेढे पडले होते. ताराराणी सर्व वेढ्यांना एकाच वेळेस तोंड देत होती. ज्यांना सातारा, विशाळगड, परळी, पन्हाळा हा महाराष्ट्रातला भाग फिरुन माहीती आहे त्यांना कळेल की अवघ्या १५० किलोमिटर मध्ये हे सर्व प्रदेश येतात व स्वत ओरंगजेबासोबत १५०,००० सैन्य या भागात वावरत होते. सर जदुनाथ सरकार लिहीतात " किल्ल्याला संपुर्णपणे वेढा घालनेही मोगलांना जमले नाही. शेवटपर्यंत मराठे त्यांना हवे तेव्हा आत बाहेर करु शकत होते. ऊलट मोगलाचेंच सैन्य कोंडल्या सारखे झाले, मराठी सैन्य बाहेरुन घिरट्या घालत व मोगलांची रसद तोडत. येन्याजान्याचे सर्व मार्ग मराठ्यांनी व्यापले होते. कुणालाच संरक्षनासाठी मोठ्या तुकडी शिवाय बाहेर पडता येने अशक्य झाले होते." बघा म्हणजे मराठ्यांनीच मोगलांना घेरले अशी परिस्तिथी निर्मान झाली. हे धैर्य, ही जिद्द कुठन पैदा झाली?<br />विशाळगडच्या वेढ्यात बादशहाचे फार मोठे नुकसान् झाले. मराठ्यांसोबत, सह्याद्री व पाऊस ह्यांनी त्याला हैरान केले. शेवटी बेदारबख्तच्या मध्यस्थीने मराठ्यांना २ लाख रुपये दिले व किल्ला ताब्यात घेतला. अनेक किल्ले मरठ्यांनी मोगलांकडुन पैसे घेऊन सोडुन दिले व त्या पैशातुन फौज भरती सुरु केली. विशाळगडच्या मोहीमेत बादशहाची ६००० माणसे कामास आली ह्यावरुन मराठ्यांनी केवढा प्रतिकार केला हे लक्षात येऊ शकते. ह्या लढ्यामुळे हैरान होऊन बादशहा बहादुरगडास गेला पण तिथे त्याला नेमाजी शिंद्याने गाठले. बादशहाला बगल देऊन नेमाजी शिंदे माळव्यात घुसला. ३०,००० मराठ्यांनी खुद्द बादशहा दक्षिनेते असताना उत्तरेत हल्ला केला. भोपाळच्या उत्तरेला मोठी गडबड नेमाजीने ऊडवली. उत्तरेत घुसन्याचा पहीला मान ह्या नेमाजीला.<br />माळव्यात गडबड उडवुन दिल्यावर बाद्शाहाने रागात येऊन आणखी सैन्य आणले व एकाच वेळेस सिंहगड, तोरणा व राजगडला वेढा घातला. सिंहगडाने ३ महीने तोंड दिले. पण मराठ्यांनी नंतर ५०००० रु घेऊन किल्ला सोडला. बादशहाने किल्याचे नामकरन केले व "बक्षिंदाबक्ष" हे नाव सिंहगडास दिले. पातशाहा पुण्यास आला व तिथे सहा ते आठ महीने राहीला. फेब, मार्च, ऐप्रील १७०३ मध्ये अनुक्रमे वरिल किल्ले बादशहाकडे गेले. अनेक किल्ले लढत होते, जिथे माणूसबळ कमी पडत होते ते किल्ले पैसे घेऊन मोगलांना दिले जात होते.<br />तिकडे धनाजी जाधव आपल्या १५,००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेला व त्यांने बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद केले. भले शाब्बस. मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात वापस आला. (१७०६)<br /><br />१५०,००० फौज, तोफा, हत्ती, घोडे काय वाट्टेल ते सोबत असुनही औरंगजेबास हार पत्कारावी लागत होती. ह्या सर्व गोष्टीमुळे तो अंत्यत निराश झाला होता. अल्लाकडे जास्त मदत होता पण अल्ला सध्या भद्रकालीच्या बाजुने होता त्यामुळे त्याला यश हाती येत न्हवते. मोगली लश्करातील एक आख्खी पिढी ( २५ वर्षे) त्याने दक्षिनेत राबविली पण कोरडाच राहीला. निराश होऊन तो २० फेब १७०७ रोजी वारला. तो वारल्या बरोबर राणीने अनेक चढाया मारत अवघ्या तिन महिन्यात सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा, परळी हे व असे अनेक किल्ले जिंकुन घेतले व स्वराज्यात आणले.<br />बादशहा १३ नोव्हेंबर १६८१ ला दक्षिनेत आला. तेव्हा पासुन ते १७०७ ह्या २८ वर्षात मोगली नेतृत्वात एकदाही बदल झाला नाही. तो स्वत दक्षिनेत राहुन स्वार्या करत होता तर स्वराज्याचा नेतृत्वात तिन वेळेस बदल झाला. आधी संभाजी नंतर राजाराम व पुढे ताराबाई. एवढे बदल होऊनही त्या सम्राटाला स्वराज्य घेता आले नाही.<br />ताराबाईने महाराष्ट्रातील सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले. कवि विठ्ठलदास लिहीतो<br />" पाटील सेटे कुणबी जुलाई<br />चांभार कुंभार परीट न्हावी<br />सोनार कोळी उदिमी फुलारी<br />या वेगळे लोक किती बेगारी"<br /><br />ह्या लढाईत फार मोठी बाजु गनिमी काव्याने लढविली आहे. मराठे यायचे, हल्ला चढवायचे व पळुन जायचे, मोगल सरदार खुश होऊन बादशहाला कळवायचे के मराठे हारले. एका पत्रात मराठ्यांनी काय करावे हे लिहीले आहे व त्यानी काय केल आहे हे मल्हाररावाने मांडले त्या पत्रातील काही भाग देतो.<br />" आपले सैन्य थोडे. यास्तव मनुष्य राखून जाया होऊ न देता, मसलतीने त्यांचा सैन्यासभोवते हिंडोन, फिरोन त्यांस लांडगेतोड करावी; रयतेची मात्र वैरण राखुन रानातील वैरण जाळुन टाकावी: रसद चालु देऊ नये; आपल्या फौजेत मनाची धारन, त्यांचा लषकरात शेराची; अशा तर्हेने करीत मराथी फौज किती आहे हा अदमास ध्यानात येऊ देऊ नये .. मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय? रात्री दिवसा कोणीकडुन येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आष्टो प्रह भय बाळगीत. पादशाही बहुत आश्चर्य जाहले की, " मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तस्स घाला घालावा, शिपाईगिरिची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारीपळुन जावे; खाण्यापिन्यास दरकार बाळगीत नाही. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटनी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे? एक्या मुलकात फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी तो दुसरेकडे जाउन ठाणे घेतात; मुलूख मारीतात; हे आदमी न्हवत, भुतखाना आहे"<br /><br />स्वतः ताराराणीने अनेक चढाया मारलेल्या आहेत. सैन्याची व्यवस्था, राज्यकारभाराची व्यवस्था, पैसा, गुजरात व माळव्यातील स्वारीची आखनी, किल्ले लढविने ह्या सर्व गोष्टींचा तिने निट मेळ घातला. वैध्यव्याचा नावाखाली रडत बसन्यापेक्षा तिने मराठी सैन्याच्या रक्तात जान फुकांयचे काम केले. १७०० ते १७०७ ह्या कालावधीत तिने स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहीला व धामधुमीच्या काळात मराठा राज्याची निट व्यवस्था लावली.<br />औरंगजेब मेल्यावर स्वस्त बसतील ते मोगल कसले. माळव्याच्या सुभेदारीवर आलेल्या आज्जम शहाने स्वतःला बादशहा घोषीत केले पण तिकडे शहा आलमचा विरोध मोडन्यासाठी तो लगबगीने उत्तरेत गेला. त्याने व झुल्फीकार खानाने ( जो गेली २० वर्षे दक्षिनेत होता) सल्लामसलत करुन शाहूला कैदेतुन मुक्त केले. ( ८ मे १७०७). शाहूला मुक्त करन्यामागे मराठेशाहीत फूट पडनार हे दिर्ध राजकारण त्या दोघांनी खेळले. शाहु हा संभाजीचा पुत्र असल्यामुळे तो दक्षिनेत जाऊन राज्य वापस मागेल व त्याला जिवत सोडल्याच्या उपकाराला जागुन तो मोगलांचा सांगन्यात राहील हे झुल्फीकाराला वाटले. ऑगस्ट २००७ ला शाहु अहमदनगर ला आला व त्याने तोच राज्याच्या खरा वारस असल्याचे घोषीत केले. मराठी राज्यात ठिनगी पडली. नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसला , रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुला येऊन मिळाले.<br />ताराबाईला हे मान्य न्हवते. तिचे असे म्हणने होते की संभाजीच्या काळातील स्वराज्य आता नाही, ते आधी राजारामने राखले व सात वर्षे आपले छोटेस राज्य तिने स्वतः औरंगजेबाशी झुंज देऊन राखले. आज्जमशहाने टाकलेला डाव यशस्वी झाला. बरेच सरदार शाहु कडुन तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराबाई कडुन झाले. शाहुच्या म्हणन्यानुसार राजारामास राज्य राखन्या साठी दिले होते व राज्य राखने ऐवढेच त्याचे काम होत. स्वत राजाराम देखील तसेच माणत होता. पण जे राज्य ताराबाईने पुन्हा निर्मान केले त्यावर ताराबाई हक्क सोडायला तयार न्हवती. दोन्ही बाजुने प्रश्न सुटेना. सामोपचाराचा मार्गाने शाहुला आपल्याला राज्य मिळेल असे वाटले नाही व त्याने युध्दाची सुरुवात केली. धनाजी जाधव जो पर्यंत शाहुच्या पक्षात येनार नाही तो पर्यंत आपली जित नाही हे शाहूला उमजले. त्याने बाळाजी विश्वनाथला (पहीला पेशवा) धनाजीस आपल्या बाजुस वळवायला पाठविले. बाळाजी ते कार्य सफल केले. धनाजी शाहुला मिळाला. खेडला उर्वरित सैन्यात चकमक ऊडाली पण त्यात शाहू विजयी झाला. या विजयामूळे त्याचे धैर्य वाढले. सेना ही वाढली.<br />कान्होजी आंग्रेने बंडावा करुन स्वराज्यातले काही किल्ल्यांवर कब्जा केला व प्रतिनिधीस अटक केली. शाहुने ते बंड मोडन्यासाठी बाळाजी विश्वनाथला पेशवेपद देऊन पाठविले व पेशवा ते कार्य यशस्वी करुन आला.<br />सर्व मोठे सरदार, महत्वाचे किल्ले शाहू कडे आल्यामुळे ताराबाईची बाजु लंगडी पडली. तिने वारंवार शाहूशी भांडन मांडले पण ते पुर्ण झाले नाही. होता होता शाहूच बळकट झाला. १२ फेंब १७०८ रोजी शाहूने राज्याभिषेक केला तो स्वतः छत्रपती असल्याची द्वाही फिरवली.<br /><br />इकडे ही धामधुम चालत असताना तिकडे उत्तरेत आज्जमशाहा व शहा आलमचे युध्द झाले त्यात शहा आलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी धारण करुन तो पातशाह बनला. पण कामबक्षाला तो बादशहा म्हणुन मान्य न्हवते, त्याला स्वतःला बादशहा व्हायचे होते. बहादुरशहाने कामबक्षा विरुध्द शाहूची मदत मागीतली. नेमाजी शिंदे बहादुरशहाकडुन लढला. ही मदत देन्यामागे शाहूला असे वाटत होते की आज्जम शहा ने जे कागदपत्र त्याला दिले त्यावर ह्या नविन बादशहाची मोहर लावता येईल. १७०९ मध्ये बहादुरशहाने कामबक्षाला पकडुन ठार मारले. अहमदनगच्या मुक्कामात त्याला मरठ्यांकडुन गदादर प्रल्हाद भेटायला गेला व त्याने बादशहास दक्षिनेची चौथाई मागीतली. झुल्फीकारखाणाने ही मागनी उचलून धरली. त्याला परत युध्द नको होते. याच सुमारात कोल्हापुरहून ताराबाईची लोक बादशहाला भेटायला आली व त्यांनीही चौथ मागीतली. ही मागणी झुल्फीकारखाणाचा प्रतिस्पर्धी पण बादशहाचा वजीर मुनीमखान याने उचलुन धरली. बादशाहाने निर्णय दिला की आधी वारसा हक्काचा निकाल लावा मग मी सनदा देतो. सनदांचे कार्य अपुरेच राहीले. शाहू आणि ताराबाई यांनी आपसात युध्दाला सुरु केली. १७०९ साली तो वापस दिल्लीला गेला व २६ वर्षांनंतर थोडीफार शांतता मराठी राज्यास लाभली.<br />सत्ता शाहूकडे न जाता ताराबाईकडे राहीली असती तर वेगळे काही घडले असते का ह्याचे उत्तर मात्र मिळनार नाही कारण ईतिहास फक्त घडलेल्या घटनांचाच विचार करतो. जर, तर ची मात्रा ईथे उपयोगी नाही. शाहूने शक्यतो सांभाळुन राहन्याचा प्रयत्न केला. तो एक व्यक्ती म्हणून निश्चीतच फार मोठा होता. त्याने कोल्हापुर व सातारा ह्या दोन्ही गाद्या एकत्र आणन्याचा विफल प्रयत्न केला पण ते जमले नाही.<br />पुढे महाराणी ताराबाईचे तिच्या सावत्र मुलाशी पटेना झाले। कोल्हापुरकर संभाजी तिचे ऐकेनासे झाला. शाहू ने त्याला मात दिली व ताराराणीस घेऊन तो सातार्यास आला. मध्ये तिने आणखी एक औरस वारस पैदा करन्याचे नाटक केले पण ते उघडे पडले. १७०० ते १७०७ मराठी राज्यावर सत्ता गाजविनार्या ताराबाईला नंतर घरकैदेत राहावे लागले. तिचा मृत्यू सातार्यास शाहू कडेच झाला. एका शुर बाईचा दुर्दैवी अंत झाला. तिने मराठी राज्यासाठी जे केले ते आधी शिवाजी महाराजांनी नंतर संभाजी व त्यांनंतर राजारामाने केले. तिच्या सोबतच भोसले घरान्यातील मर्द लोक संपले असे खेदाने मला नमुद करावे वाटते. तिचे व तिच्या नवर्याचे कार्य मराठी राज्यासाठी फार मोलाचे होते.<br /><br />संदर्भ : मराठ्यांचा इतिहास अ रा कुळकर्णी.Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-18858543039422124112009-01-23T14:35:00.007-06:002009-01-24T11:36:09.292-06:00टेन्शन नै लेने का मामूए, अरे थांब, थांब। छ्या हा माणूस ह्या जन्मात कधी ऐकनार नाही. कितीदा सांगितले की मीठ वरुन नको घेऊस? ऐकनार आहेस की नाही?<br />अगं पण, मी थोडेच घेतोय आणि मला माझी स्वतःची काळजी नाही का?<br />मोठा आलाय काळजी घेणारा, नाहीतर आज ही वेळ आलीच नसती.<br />ही वेळ म्हणजे काय? च्यायला, माझ्याच <span class="">घरात, माझ्याच</span> पैशाने मला मीठ खायला बंदी म्हणजे फार झाले.<br />ही बंदी आधी पासून असती तर मला सारख ओरडाव लागलं नस्त.<br />(मनात, आता बायको माझ्या घरच्यांचा उध्दार करणार) पण तू कशाला ओरडतेस. अगं थोडंसच घेतोय की.<br />घे. घे. अस कर ही पुर्ण मिठाची बाटली मी तुला देते.<br />अगं पुर्ण नाही, थोडेच दे. <br />(खस्सकन माझे ताट ओढन्यात येते आणि मी चामत्कारिक रित्या इकडे तिकडे पाहतोय.) <br />तुझ्या आईनेच तुला लाडावुन ठेवले त्यामुळेच झाले हे. <br />आईचा ह्यात काय संबंध. गेले १५ वर्ष मी आई पासुन लांब राहतोय.<br />त्यांचाच संबंध आहे. सारख घरात तिखटाचे खाणे तुमच्या घरी. आणी मीठही सढळ.<br />काहीही काय? च्यायला तुम्ही कधी चमचमीत खाल्ल नाही त्याला आम्ही काय करनार?<br />आलासना परत आम्ही वर.<br />दहा वर्षे होत आलीत पण 'आम्हीच' ..... .... ....<br />प्च्च। प्च्च. अगं तसे नाही काही, मी आपल उदा दिली. ( भाड्यांची आदळ आपट होण्यास आता कधीही सुरु होउ शकते).<br /><br />लोकहो, हा आजकालचा रोजचा संवाद झालाय. म्हणजे सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस ह्या मिठाने माझे घोडे मारलेय.<br /><br />झाल काय की ( थोडा फ्लॅशबॅक) त्या दिवशी सॅम्स कल्ब मध्ये बी पी चेक करन्याचे मॉनीटर दिसले म्हणून अस्मादिकांनी मोठ्या स्टाईलीत त्या मशीनमध्ये आपला हात घातला। तर अहो आश्चर्यम, १४७ / ९८ असे रिडींग आले. मी पटकन ते इरेझ करनार इतक्यात सौ तिथे आली आणी तिने हे आकडे पाहिल्यावर बडबड सुरु केली. मग परत दुसरेंदा रिडींग घे अशी आज्ञा आल्यावर मी परत सावरुन श्वासाच्या गतिवर नियत्रंन ठेवत परत एकदा सर्व सोपस्कार पार पाडले. परत एकदा १३२ / ९६ असे रिडींग आले. मी सावरुन म्हणालो, "अंग,बघ हे मशीनच फॉल्टी होत बहुतेक"<br /><br />छ्या। अरे रिडींग मध्ये १० ते १५ पर्यंत फरक पडू शकतो असे मशीनवरच लिहीलय की. इती सौ.<br />बरं, एवढ काही खास नाही मग। ते ९६ परत खाली जाईल आणी नॉर्मल वर येईल.<br />काही येत नाही। तुझी लाईफस्टाईल पाहिलीस का?<br />म्हणजे? आता <em>वा</em>इफस्टाईलचा काय संबंध.<br />वा? अरे .ला.ला. <br />(सावरुन) हो अग ला च.तुला काही म्हणायची हिंमत आहे का माझ्यात. ती लग्नाच्या दिवशी पर्यंतच होती.<br /><br />(मनात : झक मारली आणी त्या यंत्रात हात घातला. आता ही बाई ते समोसे, कचोर्या बंद करनार, ठिके रात्री ऑफीसमधून येतानाच समोसा वैगरे खाउन यायचे आता, उगीच कटकट नको आणी ते ईंडो चायनिज आता थोडे कमी केले असा आभास तरी निर्मान करायला पाहीजे. )<br /><br />काय म्हणलास?<br />काही नाही. आता जरा लक्ष ठेवावे लागेल खान्याकडे.<br /><br />कट टू<br />मित्राच्या घरी गेलो होतो। त्याचा रुटीन चाचनीचा रिपोर्ट तो मला सांगत होता. कॉलेस्ट्रॉल वाढलेय रे. आता भात बंद करतो मी - मित्र<br />हो रे, तुला लक्ष द्यावे लागेल जरा खाण्याकडे.<br />अन तुला? - आमच्या सौ.<br />मला? मला काय झालयं।<br />अरे, ह्याने सॅम्स मध्ये बी पी चेक केले होते तर तिथे १४५-९८ अश्या टाईपच्या त्याचा रिडींग होत्या.<br />१३२<br />त्याने काय फरक पडतो?<br />आँ.<br />म्हण्जे १०-२० इकडे तिकडे असे लिहीलेय तिथे<br />पण केदारचा रिपोर्ट दोन महिन्यांपुर्वी तर नॉर्मल होता की। रोज १२-१४ मैल सायकल चालवतो म्हणे तो. (तेल ओतने म्हणतात ते हे.)<br />अब्बे ये। म्हणे नाही खरच. रोज व्यायाम वैगरे करतो मी.<br />अरे पण तू सगळे अशातच चेक केले होते की अन बी पी, कॉलेस्ट्रॉल सर्व नॉर्मल आले होते की. तू डॉक्टर कडे जाउन ये. - मित्र<br /><br />कट थ्री<br />डॉक्टर कडे भेट दिली. तिथेही खालच्या आकड्याने घोळ घातलाच. तुम्ही ड्रिंक्स कमी करा. - मी घेत नाही.सिगारेट - नाही ती पण नाही.व्यायाम करा. अहो, पण मी रोजच करतो.झोप येते का? हो मग खर तर काही कारण नाही तुम्हाला हायपरटेन्शनची. (मी गप्प)<br />अस करा ह्या गोळ्या १० दिवसांनंतर चालु करू. पण तो पर्यंत तुम्ही रोज सकाळी व संध्याकाळी बी पी चेक करा। ते चेक करायचे यंत्र आणायला मला ५० डॉलरचा भुर्दंड पडला तो वेगळा.<br /><br />त्या बी पी च्या तर. आयला ह्याने माझे मिठ खाणेच बंद केले आहे. रोज सकाळ संध्याकाळ सध्या ते मॉनीटर चालू आहे. आणी बी पी च्या नावाखाली सप्पक खाणे सुरु झाले आहे. एवढेच नाही तर आता माझ्या सारख्या ऍक्टीव्ह माणसाला स्टेज टू बी पी होत असल्यामुळे ( अजुन झाला नाही, पण आकडे तसे दाखवतात, त्याला मी काय करु) रोज घरच्यांचे फोन, मित्रांचे सल्ले ह्यामूळे जिव मेटाकुटीला आलाय.<br /><br />ते रिडींग तर काही दिवसात नॉर्मलला येईलच. पण तो पर्यंत एकच मंत्र, " टेन्शन नै लेने का मामू"Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-73406065102950060442009-01-14T19:46:00.003-06:002009-01-14T19:54:19.273-06:00धर्म म्हणजे काय?<p>धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का?<br />पाहिलंत किती प्रश्न पडले ते? </p><p><br />वेबस्टर नुसार धर्माची व्याखा अशी केली आहे. "a strong belief in a supernatural power or powers that control human destiny" </p><p><br />ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते। धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.</p><p><br />हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.<br /><strong>"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"<br /></strong>विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.<br />जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो। जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.</p><p><br />कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात।</p><p>१ त्या धर्माचे तत्वज्ञान </p><p>२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड<br />नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.<br />वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.<br />आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.<br />देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.<br />विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, ""Religion is the manifestation of the divinity already within man।" And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness". </p><p><br />वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.<br />उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही। पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.</p><p><br />धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही। पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.</p><p><br />ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता </p><p>मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि </p><p>वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी: </p><p>अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि </p><p>सत्यं वदिष्यामि तन्मामवतु </p><p>तद्वक्तारम्वतु अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम् </p><p>ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: </p><p><br />अर्थात माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.<br />वेदांनुसार ब्रह्म म्हणजे काय हे पुढे कधीतरी .. </p><p></p><p></p>Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-53231419236151944062009-01-08T13:03:00.001-06:002009-01-08T13:09:32.973-06:00सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट<p><a href="http://supanth.blogspot.com/2009/01/blog-post.html">सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट</a> </p><p><br />'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय. विचार करा यातून बाहेर पडायला हवय ना! काही करायचं तर आहेच मग आपला मार्ग आपणच शोधायला लागूयात, काय म्हणता? आपण एकत्र येऊन काही तरी नक्कीच करु शकतो. आपला देश बदलायला आपण हातभार लावणार नाहीतर कोण, युनो? नक्कीच नाही. ह्यावर विचार करायला हवा. देश बदललेला सर्वांना हवाय पण वेळ व पैसा द्यायची किती लोकांची तयारी असते? आपण चार लोकं एकत्र आल्यावर सर्व काही बदलेल, आलबेल होईल अशा भ्रमात राहून चालणार नाही, पण निदान चार गरजू लोकांच्या आयुष्यात आपण नक्कीच बदल घडवू शकतो, त्यांना त्यांचे जीवन घडविण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो. ती चार लोक अजून दहाजणांचे जीवन घडवू शकतील आणि ती दहा अजून वीस .. आणि हा क्रम अव्याहत चालू राहू शकेल. आपल्यापैकी बरेच सुस्थितीत आहेत, त्यांच्या सामाजिक जाणीवा अजून जिवंत आहेत, काहीतरी करायची तळमळ आहे पण परिस्थिती, व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदार्या,परदेशातील वास्तव्यामुळे येणार्या भौगोलिक मर्यादा अशा अनेक कारणांमुळे इच्छा असूनही आपण कुठलीही मदत करु शकत नाही. भारतात रहाणार्या कित्येकांची प्रत्यक्ष तसेच आर्थिक योगदान देण्याची तर परदेशातील लोकांची आर्थिक मदत करण्याची क्षमता असते आणि इच्छाही. दरवेळी जेव्हा मदत करण्याचे आवाहन केले जाते तेव्हा हे लोक पुढे होऊन मदत देखील करतात, पण पुढे त्या पैशांचे काय होते, कुठल्या संस्थेला ते पैसे जातात त्यांचा विनियोग कशाप्रकारे केला जातो? असे बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. ह्यामुळे बरेच जण तर 'मी दुसर्यांना पैसे देणार नाही कारण पुढे त्याचे काय होते हे मला माहिती नाही, कदाचित लोक मदतीच्या नावाखाली फसवत देखील असतील, सत्पात्री दान होणार नाही म्हणून मी मदत करणार नाही' ह्या मताचे बनतात. अनेकजण सुरुवात तर जोरात करतात पण पुढे कालौघात ह्या गोष्टींचा विसर पडतो कारण आपण स्वत: अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. ह्यावर उपाय शोधायला हवा. आजच्या इंटरनेटच्या काळात आपल्या सर्वांच्या ओळखी ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जास्त होतात, त्यामुळे आम्हीही ह्याच माध्यमातून एका अनोख्या मदत गटाची, फंडाची रचना करु पाहतोय. ह्या संकल्पनेचे स्वरूप पुढे ठेवायचा हा प्रयत्न --</p><p>मदतगटाच्या निर्मितीचे उद्देश: </p><p><br />पुढे काय?</p><p><br />हे सर्व वाचन्यासाठी व सुंपथ बद्दल अधिक अधिक माहीतीसाठी <a href="http://supanth.blogspot.com/">http://supanth.blogspot.com</a> इथे भेट द्या.<br />हा उपक्रम चालु करनार्यांपैकी मी एक आहे.<br />You have to be part of the system, to chage it. तूम्हीही सहभागी व्ह्या.<br />संपर्कासाठी <a href="mailto:supant.madatagut@gmail.com">supant.madatagut@gmail.com</a> वर संपर्क साधता येइल. </p><p> </p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-91246802034573803492009-01-01T14:38:00.005-06:002009-01-01T14:49:38.139-06:00अहं ब्रम्हास्मि<p>मय्येव सकलं जातं मयि सर्वं प्रतिष्ठितम </p><p>मयि सर्वं लयं याति तदब्र्म्हाद्वयमस्म्यहम १९</p><p><span class="">माझ्यातच सर्व</span> गोष्टींचा जन्म आहे, माझ्यातच त्यांचे अस्तित्व आहे आणी माझ्यातच ते सर्व विलीन होतात. मीच तो "ब्राम्हण" आहे.<br /><span class=""></span></p><p>अणोरणीयानहमेव तद्वनमहानहं विश्वमहं विचित्रम </p><p>पुरातनोSहं पुरूषोSहमीशोहिरण्यमयोSहं शिवरुपमस्मि २०<br /></p><span class=""></span><br /><p>अर्थात<br />अणूपेक्षाही लहान असनारा मी ह्या ब्रम्हांडापेक्षाही मोठा आहे। मीच हा विश्वविधाता आहे, मीच तो पुरातन पुरूष आहे, ज्याचा हातात सर्व सत्ता आहे. कारण मी च तो पवित्र शिव आहे.</p><br /><p><br />अपाणणिपादोहम्चिन्त्यशक्ति:पश्चाम्य्चक्षु: स श्रॄणोम्यकर्णः </p><p>अहं विजानामि विविक्तरुपोन चास्ति वेत्ता मम चचित्सदाहम २१ </p><p></p><p><br />मला हात आणी पाय नाहीत। मी डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो. मलाच सर्व ज्ञान आहे पण माझे अस्तित्व (ज्ञान) कोणालाही नाही कारण मी च ते पवित्र ज्ञान वा अंतिम सत्य आहे.</p><br /><p><br />वेदैरनेकैरहमेव वेद्योवेदान्तकृद्वेदविदेव चाहम </p><p>न पुण्यपापे मम नास्ति नाशोन जन्म देहेन्द्रिय बुध्दीरस्ति २२</p><br /><p><br />सर्व वेद हे "मी" कोण आहे हे सांगन्यासाठीच निर्मान केलेले आहेत वेद, उपनिषीद व वेदान्त हे मीच निर्मान केले आहेत. मला अदि नाही ना अंत, माझा जन्मही झाला नाही वा मॄत्यूही होणार नाही.</p><br /><p><br />न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च </p><p>एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम २३ </p><p>समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति </p><p>शुध्दं परमात्मरुपम २४<br /></p><br /><p>अर्थात<br />माझ्यासाठी भूमी नाही ना ही पाणी, अग्नी वा वायू. हे काहीही नाही. मला अस्तित्व आहे आणी अस्तित्व नाहीही कारण मीच परमात्मा आहे.<br />वरिल श्लोक हे कैवल्योपनिषादातून घेतले आहेत.<br />काल परवा नेट वर भटकताना <a href="http://nivraanshatakam.blogspot.com/2008/12/blog-post.html" rel="nofollow">सोनल देशपांडेच्या ब्लॉग वर निर्वाणषटका वरिल विवेचन </a>वाचले. सोनल धन्यवाद. बहुत दिनांपासुन वरिल श्लोक लिहून काढायचे होते पण ते जमले न्हवते. आजच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काही तरी वेगळे लिहायला मिळाले.</p><p><br />वरवर पाहाता ह्या ओळी काहीही जास्त सांगत नाहीत. पण खोलात जाउन विचार केला तर त्याचा अर्थ सांगायला पाने अपुरी पडतील म्हणून मी थोडक्यात लिहीले. तेवढी माझी योग्यता नाही.</p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-32685241012715460702008-12-31T09:36:00.004-06:002008-12-31T09:46:45.081-06:00अहिंसा म्हणजे नक्की काय?<p>अहिंसा म्हणजे नक्की काय?अहिंसावादी म्हणजे काय?<br />हे गहण प्रश्न मला आजकाल पडले आहेत. "मी अहिंसावादी आहे", असे जेंव्हा कोणी म्हणतो तेंव्हा त्याला नक्की काय अभिप्रेत असते हे मला अजुनही कळत नाही.</p><p><br />मला अभिप्रेत असलेला अहिंसेचा अर्थ.</p><p>अहिंसा व अहिंसावाद - मी कोणाचीही कारण नसताना हिंसा करनार नाही. पण कोणी माझी किंवा माझ्या स्वकीयांची (देश) विनाकारण हत्या करत असेल तर माझ्या अहिंसावादात त्याची हत्या करणे वा त्याला प्रतिरोध करने हे माझे आद्य कर्त्यव्य असेन. स्वसंरक्षण म्हणजे हत्या असे मी समजत नाही. पण त्याच वेळेस मी दुसर्याची विनाकारण हिंसाही करनार नाही.</p><p><br />उदाहरणच द्यायचे झाले तर शिवाजी महाराजांनी राज्य स्थापण केले ते काही अहिंसेच्या बळावर नाही तर, स्वकियांचे रक्षण करन्याकरता हिंसाही केली. मग त्याला तूम्ही काय म्हणाल? ते हिंसक होते हे लेबल तूम्ही लावाल काय?<br />इतिहास पाहील्यास सम्राट अशोक व सम्राट हर्षवर्धण हे बौध्द सम्राट हिंसेच्या जोरावर अहिंसा लादत होते. अनेक भारतीय संधराज्यांवर त्यांनी चाल केली व घशात घातले। त्या सैन्यबळावर त्यांनी धर्म प्रसार करुन विरोधी राजांना नामशेष केले। कित्येक छोट्या मांडलिक देशांनी त्यांचाकडे असलेल्या सैन्याचा त्याग केला कारण अहिंसा ह्या विचाराचा पगडा त्यांचावर होता. त्या १५० वर्षात भारताची उत्तर बाजू अहिंसेच्या पगड्याखाली आली व परिनामी हूण, कुशान, शकांचे आक्रमन झाले. ते थोपविता आले नाही व त्यांचे राज्य उत्तर भारतावर आले. मधल्या काळात ह्यांचे पारिपत्य करन्यासाठी विक्रमादित्य, गौतमीपुत्र सातकर्णी, सम्राट पुष्यमित्र हे शांतताप्रिय पण स्वकीयांचे रक्षण करनार्या राजांनी ह्या आक्रमकांपासून आपली सुटका केली.त्याही नंतर भारतावर मुस्लीम राज्य आले कारण त्याला आपण निट विरोध करु शकलो नाही. हे सर्व लिहीन्याचे कारण की आपल्याकडे अति अहिंसेची इतिहास असताना, आपण त्यातुन काही शिकनार आहोत की नाहीत?</p><p>स्वसंरक्षन आणी मुद्दाम केलेली हिंसा हा फरक तेंव्हाही समजला नाही व तो आजही लोक समजुन घेत नाहीत. अहिंसावादी आणी स्वरक्षनवादी ह्याचात हे युध्द गेले २००० वर्ष चालू आहे. </p><p>आजकाल मुंबईच्या पार्श्वभूमीवर अनेक ब्लॉग व लेख वाचले त्यात काही जणांनी अहिंसेने हा प्रश्न सोडवावा असे लिहीलेले आहे. आपल्यापैकी बरेचजण मी अहिंसावादी आहे असे म्हणतात तर त्यांना हे म्हणन्यापाठीमागे काय अभिप्रेत आहे हे मला अजुन निटसे उमजले नाही.</p><p>अहिंसाप्रिय, अहिंसक असे शब्द योजन्या पेक्षा आपण शांतताप्रिय असे शब्द योजायला हवेत.</p><p>तुम्ही कोण? अहिंसावादी की शांतताप्रिय. पण ती शांतता कायम राखन्यासाठी सुसज्ज असनारे? </p>Unknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-13327537099311956602008-12-24T11:19:00.005-06:002008-12-25T13:26:17.202-06:00रॅन्डम मेमरीज -९आमची ट्रिप डिसेंबर एन्डला गोव्याला जाणार हे ठरले. त्यात कोल्हापुर, पुणे ही पण ठिकानं होणार होती. शाळेत असनारी माझी मावस बहिन व तिचे वडिल त्या ट्रिपला जाणार होते. मग मी ही घरी सांगीतले की मला जायचे. घरुन नाही हे उत्तर आले. तसा इतक्यात हारनारा माणूस मी नसल्यामूळे त्यातल्या त्यात सॉफ्ट टारगेट म्हणून आई पाठीमागे रोज भूनभून चालूच ठेवली. हो, ना, हो असे होत आमचे गोव्याला जाणे नक्की झाले. शेवटच्या दिवशी फि भरली. फि होती ३५०/- रु फक्त. त्यात नविन कपडे घेने, वरखर्चाला पैसे असे काही न्हवतेच. ते पैसे वेगळेच. मग दोन नविन ड्रेस घेतले गेले, इतर काही सामान घेतले.<br /><span class=""></span><br />शाळेत सहल ह्या विषयाने जोर पकडला. जो तो सहली बद्दल बोलू लागला. कोण जाणार, कोण नाही ह्यावर चर्चा झाल्या. अन्या, मिल्या, रव्या, शिन्या हे सर्व घरीच राहनार होते, शिवाय ती पण न्हवतीच. माझ्या वर्गातील कोणीही येणारं न्हवत, कारण जास्त पैसे. मी थोडा हिरमुसलाच झालो. पण 'अ' मधील चांगला मित्र कमल्या व त्याचा लहान भाउ, संदिप, अभय वैगरे लोक असल्यामूळे तेवढ काही वाटंल नाही. मग सहलीचा दिवस उजाडला. शाळेत प्रत्येकाचे पालक सोडायला आले होते. गोवा हा टॉपीक इतका हॉट झाला की एका ऐवजी दोन बसेस शाळेने केल्या. आणखी दोन तिन मास्तर, मास्तरिन्या पण घ्याव्या लागल्या. कोणी कूठे बसायचे हे ठरवून दिले. आमच्या थ्री सिटर वर मी, कमल्या अन त्याचा भाऊ बसलो. आजूबाजूलाच आनंद वैगरे लोक होती. माझी बहिन आणी काका दुसर्या बस मध्ये असल्यामूळे आता मोकळं चाकळ बोलायला, वागायला कोणाची हरकत असनार न्हवती. बस सुरु झाली आणि थोड्याच वेळात गाण्याच्या भेंड्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरु झाला. मुलींच्या कडून दोन तिन ब मधल्या मुली भारी होत्या. एक आठवीतली मुलगी पण मस्त गायची. आता तिचे नाव आठवत नाही. माझ्या कडे तेंव्हाही गाण्यांचा भरपुर साठा होता. रात्री ११ वाजे पर्यंत खेळूनही कोणावरही भेंडी चढली नाही, तेंव्हा बोअर झाले म्हणून बंद करा असे एका खविस मास्तराने सांगीतले. हे मास्तर लोक म्हणजे एक तर म्हातारे असतात. त्यांचा काळात बहुदा मुल मुली एकत्र बोलत नसत, त्यामूळे त्यांना ह्या गमती जमती माहीतच नसतं. कधी न्हवे ते पहिल्यांदा शाळेतल्या मुलींबरोबर रात्रीही राहायची गमंत पोरांना सोडायची न्हवती. ( मला खात्री आहे की मुलींना पण तसेच वाटत असेल). अन हा खविस मध्येच बोलला. तो दिवस संपला.सकाळी कुठल्याश्या हॉटेल वर गाडी थांबली होती, व मास्तर लोक सगळ्यांना उठवून तोंड धूने, चहा नाश्ता करने असे काहीसे सांगत होते. मी अन कमल्या उठलो व फस्क्लास पोहे अन चहा मारला. एका मुलीला बहुतेक कमल्या आवडला होता की काय माहीत नाही पण ती देखील जवळ आली अन म्हणाली, 'कमलेश चहा झाला का? मी चाल्लेय तर आणून देते'. भोंदू कमल्यला ते काही कळाले नाही, अन ऋष्या त्याचाकडे पाहू लागला. तो नाही म्हणाला. बिचारी निघून गेली पण उत्साहाने गाडी सुरु झाल्यावर आमच्या जवळच्या सिट वर येउन बसली. आनंदने अन मी एकमेकांकडे नक्कीच पाहिले कारण नंतर दोन दिवस आम्ही तिच्यावरुन चिडवत होतो. थोड्यावेळाने कोल्हापुर आले बहुतेक. एवढे निट आठवत नाहीय आता पण दर्शन करुन आम्ही परत बस मध्ये आलो व एका जेवनावळी पाशी थांबलो. तिथे जेवन वैगरे झाले. आमच्या बहिनाबाई म्हणाल्या की तू त्या बस मध्ये थोडा वेळ येशील का?, तिच्या गँग मध्ये कोणाला मूकाअभिनय येत न्हवता. (मूकअभिनय म्हणजे डम्ब शराडस). मी हो म्हणालो व तिच्या सोबत गेलो. मग त्या बस मध्ये थोडा वेळ टाइम पास केला. बस बदली केल्यामूळे एक बरे झाले की बहिनीच्या सर्व मैत्रींनी एकदम खुलून बोलायला लागल्या. ह्याचा फायदा घेन्याचे ठरवले. :) डिडी पण होतीच. (डिडी कोण? हे माझ्या नोव्हें मधल्या शाळा लेखात वाचायला मिळेल). आम्ही असे मजल दरमजल करत आम्ही रात्री सावंतवाडीला पोचलो. तिथे पोचायला खूप रात्र झाली त्यामूळे जेवायला काही मिळालेच नाही. बस स्टॅन्डवर गाड्या उभ्या केल्या होत्या तिथे एक ऑम्लेटचा गाडा होता. बहिनीने व काकांनी ऑम्लेट खाउन घेतले पण मी काही अंडे खात न्हवतो त्यामूळे उपासच घडला. शाळेचा हलगर्जीपणा तेव्हां आवडला न्हवता. दोन्ही बसमध्ये ९० पोर होती. असे उपाशीच ठेवायचे म्हणजे कमाल आहे। दुसर्या दिवशी गोव्याला पोचलो. तिथे मग बीच वरच कूठल्या तरी फालतु हॉटेलात आमची रहायची सोय होती. हॉटेलातून बाहेर पडले की समुद्र. पण मास्तर लोकांनी परवानगी शिवाय हॉटेलाच्या बाहेर पडायचे नाही ह्याची सुचना दिली होती. एक दोन दिवस मग वेगवेगळे बीच बघने वैगरे झाले. ते फेमस चर्चही बघीतले. तिथे एक माणूस अत्तराच्या सहा बाटल्या अवघ्या ५ रुंना विकत होता म्हणून मी आणि बहिनीने विकत घेतल्या. नंतर घरी आल्यावर कळले की ते रंगीत पाणिच होते बाकी काही नाही. चर्च मधील अनेक वर्षाचे प्रेत पाहिले व प्रश्न पडला की काय गरज आहे प्रेत तसेच ठेवायची? बिचार्याला देहभोग अजूनही आहेतच. असो तो भाग वेगळा. रात्री मसाला पाणं खायला मी अन कमल्या गेलो. डिडीला सुगावा लागला व ती माझ्या पाठीमागे आली. तिने मलाही पान आणायला सांगीतले. मी तिला मसाला पान आणून दिले ते काही मुलींनी पाहीले. मग पुढचे दोन चार दिवस त्या उगीच आम्हाला चिडवत होत्या. मुलांनी पण विचारले की तूझी एवढी ओळख कशी काय की तू पान बिन पण तिला नेउन देतोस? काय उत्तर देनार? चार दिवस उगीच लोक चिडवत होते. ते ऐकून घेतले. पण डिडीचा आणि माझा दोस्ताना ह्या ट्रिप मूळे वाढला होता हे नक्की. जेवायला सोबत जाने, चहा वैगरेची देवान घेवान इ इ गोष्टी आमच्यात होत होत्या. आणि बहिन सोबत असल्यामूळे सर लोक काही बोलायचे नाहीत. मलाही ही नेमके कळेना की डिडी मला आवडतेय की ती? तिच्याबाबत पुढे काहीही होत न्हवतेच. मग नक्की काय? शेवटी दोघींबाबत काहीही झालेच नाही ही गोष्ट निराळी. पण तेव्हा माझ्या मित्राने योग्य वेळी जर माघार घेतली असती तर नक्कीच मी डिडी बाबतीत काही केले असते असे कॉलेज मध्ये अनेकदा वाटले. पण काही झाले नाही तेच बरे झाले असेही वाटते. ती फारच फॉर्रवर्ड होती. १२ वीत ती सिगरेट पिते असे ऐकले होते, खरे खोटे तिलाच माहीत.<br /><br />बस मध्येच सर्व मुल कपडे वाळायला घालीत. दोन दिवस चांगल्या असनार्या बसमध्ये नंतर कोणाला चढावेसे वाटत न्हवते. पोराच्यां बन्यनी, चड्या वैगरे वरच वाळू घातलेल्या होत्या. आणि मुलींना तसे करता येत न्हवते पण त्यांचा सर्व बँगाना एक वेगळाच ओलसर वास येत होता. आमच्या घरच्यांनी ती भानगडच ठेवली नाही. मला तिन-चार आतल्या कपड्यातील जोड दिले होते, त्यामूळे माझी बॅग किंवा सिट ओली न्हवती. पण सर्व बॅस मध्ये घाण वास भरुन होता. घरुन निघताना वडिलांनी मला ७५ रु दिले होते. कमल्याला त्याचा वडिलांनी ५० रु दिले होते. ते त्याने कागदी पागटीत ठेवले होते. एके दिवशी त्याचे पाकीट सामान काढताना खाली पडले. ते मला सापडले. उघडून पाहीले तर ५० रु. मला ते ठेवताही आले असते कारण तेंव्हा बस थांबलेली होती व तिथे माझ्याशिवाय कोणीही न्हवते. पण मी सरळ कमल्याला वापस केले. काकांनी फोकाने बडवल्यामुळे ते पैसे आपण घ्यावेत असा विचारही शिवला नाही.<br />मास्तर लोकांनी गोव्यातून बहूतेक फेनी घेतली। वापस येताना गाडी खाली एक कुत्रे आले, पोलींसानी गाडी थांबवली तर ह्या मास्तर लोकांनी फेनीच्या बाटल्यांपैकी एक -दोन पोलीसांना दिल्या.<br />भ्रष्टाचार येथून रुजतो तर.<br /><br />३१ डिसे च्या रात्री आम्ही पुण्याकडे रवाना झालो. रात्री आम्हाला काही तरी देन्यात येईल असे घोषीत झाले. ११.१५ च्या सुमारास बस थांबली म्हणून जाग आली तर मास्तर म्हणाले, थोडा वेळ झोप आणी १२ वाजता उठ. मला काही जाग आली नाही. कमल्याने दुसर्या दिवशी सांगीतले की गोळ्या वाटल्या. भेंडी, गोळ्या खायला रात्री १२ वाजता उठायचे काय? अस्सा राग आला होता आम्हा सर्वांना. अन काही मास्तर लोकांनी मात्र फेनीचा आस्वाद घेतला अशी अफवा पण उठली होती.<br /><br />आम्ही पुण्यात येउन पोचलो। जेवून सारस बागेत आम्हाला नेले. तेथे गणपतीचे दर्शन झाल्यावर घोषना केली की ज्यांचाकडे ५० रु च्या वर आहेत तेच लोक पुण्यातील प्रसिध्द अश्या खरेदीच्या ठिकानी म्हणजे तुळशी बागेत जातील. माझ्याकडे, कमल्याकडे, आनंदकडे, डिडी कडे, संगिता कडे ५० रु न्हवतेच. आम्ही मग तिथेच गप्पा मारत बसलो. बरीच जनता मागे उरली व बरेच जण गेले. बहिनाबाई गेल्या. आम्ही मस्त पैकी गप्पा मारल्या व गाण्याच्या भेंड्या खेळल्या. तिथे एक काकडी विकनारा माणूस होता. कोणीतरी काकडी विकत घेतली. साल काढलेली, मधोमध चिरुन चार उभ्या फोडी करुन तिखट मिठ लावलेली काकडी खाणे हे तूळशी बागेत जाण्यापेक्षा नक्कीच बरे वाटले.<br /><br />दुसर्या दिवशी सिंहगडावर गेलो. तिथे बैनवाड मास्तरला चकवा लागला असे पोर म्हणाले. आम्ही काही जण मस्त पटपट वर चढून गेलो. जाताना उरलेल्या ७-८ रु तून ताक वैगरे पिले. इथे एक गोष्ट घडली ती माझ्या लक्षात नेहमी राहीन. ह इथले जेवन स्वतःच्या पैशाने घ्यायचे असा अचानक फतवा निघाला. सिंहगडावर झूनका-भाकरी मिळते. सर्वजन ती मस्त पैकी खात होते. माझ्याकडे जास्त पैसेही राहीले न्हवते. बहिन व काका झुनका-भाकरी खात होते पण काकांनी मला काही विचारले नाही की तू खाणार का? त्यांचा मुलीसारखास मी पण त्यांचा कोणी तरी होतोच. मग एक भाकरी मला घेउन न द्यायला काय झाले? शिवाय वर त्यांनी मला विचारले होते की तू जेवलास का? मी त्यावर नाही म्हणालो होतो आणी आदल्या दिवशीच तूळशी बागेत मला पैसे नसल्यामूळे जाता आले नाही हे ही त्यांना माहीती होतेच. बर्याच वेळा नंतर बहिनीने विचारले की जेवन झाले का? मी म्हणालो पैसेच नाहीत जास्त. कमल्याकडेही पैसे न्हवतेच. मग आमच्या दोन तिन मित्रांनी मिळून एक दोन प्लेटी जास्त आणल्या व त्यातली अर्धी अर्धी भाकर आम्ही खाल्ली. काकांनी तसे कदाचित पोरांच्यावर लक्ष देन्यामूळे केले असेल पण तो घाव आहे तो आहेच. इतर अनेक घांवासारखा. तेंव्हा कळले, "नातेवाईकांपेक्षा मित्र जवळचे असतात."मग आमची वरात परत बसकडे व तेथून आमच्या शहराकडे वापस निघाली. येताना नंतर कूठल्याशा गावी थांबून सर्वांना खिचडी खायला घातली व शाळेपाशी गाडी आली. सर्वांचे पालक घ्यायला आले होते.<br />ट्रिप संपली होती पण काही नविन प्रश्न ट्रिप व्यवस्थापणा बाबत निर्मान झाले, जसे दोन वेळा बरेच जन उपाशीच राहीले वैगरे। त्यावरुन काही काळ रण माजले होते. पण काही मास्तर लोकांनी त्या पैशात काजू व फेण्या नक्कीच घेतल्या असे तेंव्हा मात्र वाटले होतेच.<br /><br />क्रमशःUnknownnoreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-39665031868148545812008-12-23T10:31:00.003-06:002008-12-23T10:33:10.753-06:00रॅन्डम मेमरीज -८<p>माझ्या आई वडिलांना माझी चिंता होती का प्रश्न मला कधीच पडला नाही. पण आज हे सर्व आठवून लिहीताना ( आठवून लिहीताना म्हणने चूक होईल कारण मला हे सर्व लिहीताना आपोआप आठवत चाल्लयं, मी आठवून लिहीत नाहीये) हा प्रश्न पडलाय. घरी जाऊन विचारेन आज. की माझा तूम्हाला प्रश्न पडला होता का? लहानपणी माहीत नाही पण कॉलेज मध्ये नक्कीच पडला असनार कारण मी कॉलेज मध्ये भयंकर उचापत्या केल्या आहेत. पण त्या सर्व राजकिय. त्यात पानटपरीवर थांबून पिचकार्या मारत पोरींना छेडने, शिट्ट्या व टाँट मारणे हे कधी केले नाही. उलट ते करनार्यांना बदडले मात्र आहे. ते किस्से मोठेपणीचे. तूर्तास आम्ही लहान आहोत म्हणून लहानपणीचेच किस्से. </p><p><br />जिवशास्त्र, रसायनशास्त्र वैगरे माझे जानी दुश्मन होते (आणी आहेत). एकदा बाईंनी जिवशास्त्राचे प्रॅक्टीकल म्हणून एके दिवशी बेडूक आणला व तो सर्वांसमोर कापला. त्याला कापताना बघून मला चक्कर आली व मी डोळे मिटून घेऊन ते प्रॅक्टीकल पाहीले. नंतर बाईंनी प्रश्न विचारला, काय रे यकृत कूठेल अन प्लिहा कूठली? मी आपले अंदाजांनेच ठोकून दिले. बाईंनी, "काय दिवे लावनार हा पोरगा, चांगला ब्राम्हणाचा आहे, वाटत नाही ह्याचा कडे बघून" अश्या रितीने माझ्याकडे पाहीले. ती अक्षर मी ओळ्खली कारण त्याच नजरेने माझ्याकडे भौतीक व रसायनचे सर देखील पाहायचे. ह्या विषयांनी मला वेठीला धरले होते. इतिहास आणि भूगोल माझ्या आवडीचे विषय होते. गणितात गति होतीच. एकदंरीत कधीही मला, 'होपलेस' म्हणून कोणी पाहीले नाही. पण मी त्यांना मार्क कमी मिळवून चकित मात्र करीत असे. मला जो कोणी तेंव्हा भेटायचा, तर त्यांना असेच वाटायचे की हा हूशार आहे, पण मार्क बघीतल्यामात्र चकित होत असत.मूळात अभ्यास करने हा माझा प्रांत तेंव्हा न्हवता. उगीच खोटे का बोला? अभ्यास खर्या अर्थाने सुरु झाला तो ग्रॅजूऐशन नंतर. तो पर्यंत फक्त परिक्षा देने व न चूकता, डिस्टींग्शन मध्ये (स्वघोषीत, ६० पैकी ५२-५४) पास होणे व बाकीचा वेळ वाचन करने, क्रिकेट खेळने ह्यातच घातला. आणि तेंव्हा अभ्यास हा बाकी लोक करायला लावायचे. व आता मी स्वतः मला करावा वाटतो म्हणून करतो हा फरक आहेच. तर आम्ही दहावीचा अभ्यास नेटाने पुढे सरकवीत होतो. माझ्या बाबतीत एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे एकपाठीपणा. मला एकदा वाचलेले लक्षात राहते असे तेंव्हा मी छातीठोकपणे सांगत होतो, आताही सांगतोच पण छाती ठोकत नाही इतकेच. तर त्यामूळे बरेचदा अरे हे तर आपणं वाचलयं परत काय वाचायचे असे वाटत असे व मी परत ते वाचत नसे.</p><p><br />दहावीला गणिताला ट्यूशन होती. तो मास्तर गाजलेला होता पण हिरवट होता. त्याचा एक किस्सा लिहील्याशिवाय माझी दहावी होणार नाही म्हणून लिहीतो. वर्गात मुल मूली एकत्रच होत्या. एका मूलाचे नाव होते, 'लोंबते' तर ते मास्तर, त्याला काय लोंबते काही लोंबते की नाही हे विचारुन मूलींकडे पाहत असे. अश्या मास्तरांना फोडून काढायला हवे. मी ती ट्यूशन अर्धवट सोडली. म्हणजे पुढे गेलोच नाही.इंग्रंजीची देखील शिकवनी होतीच. त्या ट्यूशनला माझी एक अत्यंत जूनी मैत्रीन, जी माझ्यासोबत १ ली ते ४ थीत होती, ती यायची. ती दिसायला इतकी सुंदर आहे की ज्याच नाव ते. शिकवनारा मास्तर देखील तिच्याकडेच बघून शिकवायचा. ती आणि मी सोबत अभ्यास करायचो. तिच्यासोबत क्लासमध्ये फक्त अभ्यास करावा वाटत असे. तिची आणी माझी नाळ काही बाबतीत जूळली होती, जसे अवांतर वाचन, इतिहास, वक्तॄत्व वैगरे. ती माझ्या शाळेत न्हवती. नंतर तिची आणी माझी बॅन्च वेगळी ( मी कॉमर्स व ती हट्टाने आर्टस, नंतर इग्लींश एम ऐ झाली) होती त्यामूळे सहवास राहिला नाही पण मैत्री अजुनही आहेच. ते दिवस पटापट गेले. मी आणी ती मिळून वर्गात झालेल्या परिक्षांचे पेपरही तपासायचो. </p><p><br />खर्र खर्र सांगायचे तर मला हे न आणि ण चे घोळ अजूनही कळत नाहीत, ह्याचे कारण बहूदा मराठी व्याकरणाकडे कमी लक्ष देणे हे आहे. मला माहीतीय की ह्या लिखाणात अनेक चूका आहेत. पण तरीही, 'माझे जिवन गाणे' मी पूढे रेटतोय ते केवळ मला हे लिहून काढाव वाटतय म्हणून. ह्या लिखानातून मी माझे हरवलेले बालपण ( हा छोटा की मोठा न) शोधतोय आणी पून्हा जगतोय इतकेच.<br />मला वाचनाची सवय कधी लागली हे माहीत नाही. पण त्यात माझ्या आजोळी चालनार्या चर्चांचा प्रभाव होता हे नक्की. माझी एक मावशी, मामा हे मराठीचे प्राध्यापक तर, दुसर्या मावशीचे यजमान संस्कॄत पंडित व प्राध्यापक, उरलेल्या मावश्या पण शिक्षकच व सर्वच जण वाचक. दिवाळीच्या सुटीत त्या भावा-बहिनीच्यां पुस्तकावर चर्चा चालत, शिरवाडकर, मंगेशकर, पाटील, पुरंदरे, आरती प्रभू ही नाव घरच्यांचीच वाटत. आरती प्रभूंच्या कविता, नरहर कुरूंदकरांची पुस्तके ह्यावर रात्र रात्र चर्चा होत. मामाच्या घरी मोठमोठ्या साहितीकांचे येणेजाने असायचे, त्यामूळे नरकर कुरुंदकर, लक्ष्मीकांत तांबोळी वैगरेंची भेट झाली. अश्यातच कधीतरी मला वाचणाची सवय लागली असेल. ती हळू हळू वाढतच गेली. इतकी वाढली की जिवशास्त्राच्या बारिकश्या पुस्तकांत मी, 'पडघवली' टाकून वाचलेय. घरच्यांचा असा भ्रम की पोरगं अभ्यास करतंय, पण म्या म्हणजे. आपण लई हूश्शार. पण सांगायचे म्हणले तर आमची वाचनाची गाडी रुळावरुन ८० किलोमीटर प्रति तास धावू लागली होती. म्हणजे मी तासाला ८० पाने वैगरे वाचायचो. नशिबाने अजुनही वाचनाची सवय तूटली नाही.<br />अश्यातच आमची ट्रिप गेली। गोव्याला, त्यावर आता उद्या लिहीतो.</p><p><br />क्रमशः</p>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-1120229920611718462008-12-22T09:46:00.002-06:002008-12-22T09:48:01.088-06:00रॅन्डम मेमरीज - ७'अ' मधल्या मूलींनी आपल्याला बोलावे, त्यांचा सहवास घडावा असे आमच्या वर्गातील सर्वांना वाटायचे. एकतर आमच्या वर्गातील मूली म्हणजे, 'सावळा गोंधळच' होता. 'अ' वर्गात खरच 'माल' मूली होत्या हे मात्र मान्य करावेच लागेल. त्यांची इथे नावे सांगत नाही. पण बहूतेक तेंव्हा सर्व शाळेवाल्या लोकांनी असा रुल काढला असेल, की ज्या मूली दिसायला सुंदर त्या 'अ' मध्ये, जे मूल वागायला बावळट ते 'अ' मध्ये व उरलेली कचरा पट्टी उतरत्या क्रमाने 'ब', 'क' आणी 'ड' मध्ये. खर काय ते माहीत नाही पण असे काही तरी असेल असे मला तेंव्हा वाटायचे. <br /><br />एक सांगायचे राहिलेच. माझी मावस बहिन देखील माझ्याच शाळेत, माझ्याच वर्गात पण 'अ' तूकडीत होती. तिच्या मैत्रीनी देखील माझ्याही मैत्रीनी होत्या. त्यामूळे आपली वट पोरांत वाढली होती. बहिन देखील बर्यापैकी हूशार होती, त्यामूळे तिच्यात व माझ्यात लहानपणापासूनच एक अघोषीत स्पर्धा होती बहूतेक. ती खास करुन तिच्या वडिलांनी लावलेली होती. आमचे पिताश्री म्हणत," पोटा पुरता अभ्यास कर, खेळायचे वय आहे खेळून घे,' तर तिचे वडिल म्हणत,' केदार दिवंसेदिवस हाताबाहेर चाल्लाय. लक्ष ठेवा.' त्या हाताबाहेर जाण्याला मी वेगळाच अर्थ लावला. मला वाटले की आता त्यांचा हातात मावत नाही कारण माझी उंची खूप आहे. तर त्या अघोषीत कॉम्पीटिशनमूळे मला दर परिक्षे नंतर खूप माणसिक त्रास व्हायचा. एक तर माझी बहिन शाळेत हूशार, गाण्यांत हूशार, क्लासीकल शिकनारी असे काही, काही होती आणी आम्हास बॅटी शिवाय दुसरी भाषा कळायची नाही. बॅट बॉल मध्ये मी इतका रममान होतो की, जेंव्हा आम्ही पायी कुठे जायचो तेंव्हा मी आणि माझा भाऊ चालताना अचानक वेग घेऊन पळत जाऊन बॉलींगची ऍक्शन करत असू आणी लगेच तो काल्पनीक बॉल, काल्पनिक बॅटीने मारून सिक्स मारन्याचा अविर्भाव करत असू. तर असे हे आम्ही अन ह्या विरुध्द माझी मावस बहिन. मग दर परिक्षे नंतर माणसिक छळ. आधी तिच्या वडिलांकडुन, नंतर आमच्या आजोळच्या मंडळी कडुन. एक बरे होते आमची जोशी मंडळी कधी परिक्षेच्या मार्कांवरुन आम्हाला धारेवर घ्यायची नाही. तसा आम्हा जोश्यांत शिक्षनाचा गोंधळ होताच पण आमच्या माय बापांनी कुठल्यातरी जन्मी खूप पूण्य केल्यामूळे आम्ही मुलांनी घराला खूप पूढे नेले असे लोक म्हणतात. आता पूढे म्हणजे कूठे हे आम्हा मुलांनाही माहीत नाही. आम्ही काय पराक्रम केले नाहीत पण ते आत्ता तेव्हां मात्र मग आजोळची मंडळी जोश्यांचा उध्दार करत.<br /><br />ह्या कम्पीटिशन मूळे मला खूप त्रास भोगावा लागला। तिच्या सारखेच क्लास माझ्या मामा लोकांनी मला लावले, तिच्यासारखेच वेळापत्रक करुन मामा लोक माझ्या पाठीमागे अभ्यासाला लागले. इतकेच काय तर मी १० वीला जास्त मार्क मिळवावेत म्हणून त्यांनी माझी १० वी आजोळी होईल असा रुल केला. माझे आजोळ, माझ्या घरा पासून दो किलोमिटर वर होते त्यामूळे फार काही लांब होत अश्यातला भाग नाही. तर आमच्या ह्या बहिनीमूळे जेवढे फायदे झाले ( ते मुलींशी ओळख असन्याचे) त्यापेक्षा जास्त तोटे झाले व माझे क्रिकेट ह्या लोकांनी निदान १० पुरते बंद पाडायचा घाट घातला. ९ वी च्या सूट्यांमध्ये मी औरंगाबादला आत्याकडे गेलो. त्या दहावि सुरु व्हायच्या सुट्या होत्या. म्हणल आत्ता तरी ही लोक भनभन लावनार नाहीत तर इतक्यात माझ्या बहिणीने १० वी चे व्हेकेशन क्लासेस लावले व मोठ्या मामाने औरंगाबादहून परत आणन्याचा वटहू़कूम काढला. माझे वडिल औरंगाबादला आले व ते मला घेऊन वापस आले.<br /><br />मग आमची वरात रोज सकाळी ९ ला निघायची व त्या व्हेकेशन क्लासेस पाशी धडकायची. त्यांनी वेगवेगळ्या शांळामधून वेगवेगळे मास्तर निवडले होते व ते हा जोडधंदा सुट्यात पैसे कमवायला करायचे आणि वर आम्हां मूलांच्या सुट्याही खराब करायचे. (त्यातील काही खरच मनापासून शिकवायचे). मग तिथे ९.३० ते ४.०० क्लासेस आणी मधला एक तास सुटी असा दिनक्रम असायचा. मला आधीच अभ्यासाचा कंटाळा. त्यात कोणी असे डांबून ठेवले की मग अजुनच प्रॉब्लेम. माझ्या मोठ्या काकांनी मला एक इलेक्टॉनीक घड्याळ खास दहावी साठी घेउन दिले. त्या क्लासेस चा एक तास ५० मिनीटांचा असायचा. एखाद दिवशी मी गेलो नाही की मग बहिनाबाई तक्रार करायच्या. काय करावे हे सुचत न्हवते आणी एके दिवशी मला उपाय सुचला. मग मी माझ्या घड्याळ्यावर ५० मिनीटाचे टायमर लावायचो व तेवढे सेंकद मोजून काढायचो. मग माझा वेळही जायचा, मी क्लास मध्ये दिसत असल्यामूळे बहिनाबाई तक्रार करायच्या नाहीत आणी मी तिथे रोज असतो म्हणजे माझा १० वी चा अभ्यास व्यवस्तिथ चालत आहे हे सर्वांना वाटायचे. माझ्या बाजूला संदिप देशपांडे नावाचा पोरगा बसायचा. तो देखील बोअर व्हायचा बहूतेक. मग तो आणी मी हा खेळ खेळत दिवसभर बसायचो. त्याचाशी मैत्री वाढली. तो आमच्या शाळेत न्हवता पण पुढे चांगला मित्र झाला. त्याची बहिन देखील आमच्याच वर्गात होती. भावना देशपांडे पण मी, भावडी, संद्या अशी जोडी झाली व आम्ही हळूहळू आमच्या बहिनाबाईला टाळू लागलो. ती बिचारी खरच अभ्यास करायची. तिच्या वडिलांनी तिला एक वेळापत्रक बनवून दिले होते. ते वाचून आमच्या मातोश्रींनी तसेच काही तरी करा असा अनावश्यक सल्लाही दिला होता. पण तो मी शिताफीने टाळला. तिच्या वेळापत्रकात विषयानूसार वेळ वैगरे अलोकेट केला होता, फारच सखोल विचार करुन ते वेळापत्रक तयार केले असनार हे नक्की. तसा अभ्यास तिने केला का हे माहीत नाही पण तिच्या वेळापत्रकामूळे माझ्या मामाने मी देखील अभ्यास करावा हे टुमने लावले व मला तो काही महिन्यांकरता त्याचा कडे घेउन आला.<br />तो बँकेतून आला की दोन तास माझा अभ्यास घेत असे. हे दोन तास मात्र अभ्यास करने भागच होते, कारण पळवाट न्हवती म्हणून मग मी काही दिवस तसा अभ्यास केला. नंतर माझ्या लक्षात आले की मामा दरवेळी वरचे घड्याळ पाहून ठरवतो व साधारन ८.४५ झाले की तो अभ्यास थांबवतो. मग मी एक शक्कल लढवली. तो थोड्यावेळाकरता खोलीतून बाहेर गेला की मी उठायचो व ते घड्याळ २० मिनिटे पुढे करायचो. मग तेवढाच २० मिनीटे अभ्यास कमी व्हायचा व जास्त झोपायला मिळायचे. मग सकाळी उठून परत ते घड्याळ मागे करुन वेळ बरोबर करत असे, म्हणजे परत त्या दिवशी संध्याकाळी पुढे करायला मोकळा. हे त्यांना अजुनही कळले नाही. अभ्यासातले माझे हे टॉप सिक्रेट आज मी इतक्या वर्षांनंतर सांगीतले.<br /><br />क्रमशःUnknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-71567976650831412872008-12-19T13:56:00.001-06:002008-12-19T13:58:48.909-06:00रॅन्डम मेमरीज -६मधल्या काळात आमची क्रिकेट ची टिम मस्त तयार झाली होती. प्रत्येक जण आता मस्त खेळू शकत होते ही जमेची बाजू होती. नाहीतर लोक खेळायला येते असे म्हणतात आणि मैदानात काहीच करत नाहीत.<br /><br />मला एक मॅच आठवते. आमच्या टिम ने मी ज्या कॉलनीत राहतो त्या टिमशी मॅच खेळायची ठरवले. त्या कॉलनीच्या टिममध्ये मी ही कधी कधी खेळायचो. बहुदा ही नववीची गोष्ट असावी. कॉलनीच्या टिम मध्ये काही मुलं कॉलेजला जाणारी पण होती. पण आम्ही ठरवीले की काही हरकत नाही, खेळून बघूया. शिवाय मी दोन्ही टिम कडून खेळनारा असल्यामूळे शाळेच्या टीम साठी इनसाईड इन्फो आपसुकच मिळत होती. मी तसे आमच्या टिमला सांगीतले ही. मॅच २१ रु ने घ्यायची ठरली. आम्ही सर्वांनी २, २ रु कॉन्ट्री मारले व यशवंत मैदानावर जरा लवकरच आलो. थोडावेळ प्रॅक्टीस केली आणी नंतर आमच्या कॉलनीची टिम आली. २० ओव्हर्सची मॅच ठरली. टॉस जिंकून त्यांनी बॅटींग घेतली. आणी मिल्याने पहिली ओव्हर टाकायला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरपासूनच कॉलनीच्या टिमने आम्हाला बॉन्ड्री पार पाठवायला सुरु केले. मिल्याने १, रघ्या ने १, मी १, रव्या ने दोन अश्या विकेटस तर घेतल्या पण २० ओव्हर्स नंतर स्कोअर झाला होता ११८.मध्यंतर झाले व टिमच्या काही लोकांच्या लक्षात आले की आता आपण काही ११८ रन्स काढू शकत नाही. मी पेप्सी ( त्या काळी पेप्सी कोला नावाचे एक मेनकापडात गूंडाळलेली बर्फाची कॅन्डी मिळत असे, ती जबरी असायची, ५० पैशाला एक) घेन्यासाठी जाउन आलो तर टिमने निर्नय सांगीतला की न खेळताच पैसे त्यांना देउन टाकायचे व उरलेल्या वेळात मैदानात एक टिम खेळत होती त्यांचा सोबत मॅच घेऊन ती जिंकून पैसे वसूल करायचे. हा निर्णय मला जरी आवडनारा नसला तरी, माझ्या कॉलनीच्या टिमला जाऊन सांगावा लागला. आम्ही ती मॅच अर्धवटच सोडली. म्हणजे बॅटींग घेतलीच नाही व २१ रु देऊन टाकले. पुढे वर्षेभर तरी माझ्या कॉलनीच्या टिमचे लोक पळपुटे म्हणून मला चिडवायचे.पैदानात तीथेच आणखी एक टिम खेळत होती. त्यांना १० ओव्हरची मॅच ११ रु साठी खेळाल का असे कोणीतरी जाउन विचारले ते हो म्हणाले. आम्ही टॉस जिंकला व बॅटींग घेऊन १० ओव्हरस मध्ये ४५ रन केले. तेवढे रन आज कमी वाटत असतील पण तेव्हां खूप जास्त वाटायचे. विरोधी पक्षाला केवळ ३१ रन मध्ये आउट करुन ११ रु जिंकले. दिवस वसूल झाला. आम्ही य मॅचेस हारल्या व य जिंकल्या पण ह्या एकाच दिवशीच्या दोन मॅचेस मनात कायम घर करुन आहेत.<br /><br />रघ्याने एके दिवशी शर्यत लावली की ह्या ओव्हर मध्ये निदान १० रन काढून दाखवायचे। मी ती स्विकारली. रघ्याच्या पहिला बॉल माझ्या पायावर आदळला. शून्य रन्स. दुसरा बॉल मी फ्रंटफूट वर खेळला, तरीही सरळ प्लेअर कडे शून्य रन्स. पहिले दोन बॉल असे गेल्यावर मिल्या मला चिडवायला लागला. मलाही जाम टेन्सन आले. म्हणंल शर्यत लावली तर झोकात पण चार बॉलमध्ये आता १० रन्स अवघड आहे. तिसरा बॉल मी परत फ्रंट फूट वर खेळून लाँग ऑन च्या दिशेने फेकला. बॉल बरोबरच बॅट च्या मध्ये लागला होता. टाईमिंग खूप अप्रतीम जमल्यामूळे तो सिक्स गेला. रघ्या तर चाट झालाच. पण मीही चाट झालो होतो. म्हणल, सटकेमे मटका. चौथ्या बॉल वर १ आणि पाचव्या बॉलवर दोन रन्स काढल्या. सहाव्या बॉलवर माझी विकेट पडली. शर्यत जरी जिंकली नाही तरी ती ओव्हर मला नेहमी आठवते. अझरने शारजाला, जडेजाने य वेळा, युवराजचे सिक्स स्किसेस, तेंडल्यांचे ब्रेट ली ला मारलेले तिन चौके ह्या सोबत मला माझा तो सिक्स आठवतो. त्या सिक्सने एक वेगळी जागा घेतली आहे.<br /><br />बळवंत पाटील आणि अभोंरे असे दोन क्रिकेट मधील राक्षस 'ब' मध्ये होते। ते खरच चांगले खेळायचे. दोघांचेही बाप श्रिमंत असल्यामूळे त्यांचाकडे महागाच्या बॅटी होत्या. लाईटवेट पण मस्त. अंभोर्याची बॉलींग पण मस्त होती. दुधाटे नावाचा आणखी एक मुलगा त्यांचा टिम मध्ये होता. हे तिघ ज्या दिवशी एकत्र खेळायचे त्यादिवशी बहूदा जिंकायचेच. पाटील्-दूधाटे जोडी फूटायची नाही. मग आम्ही वेगवेगळे प्रयोग करायचो आणि तसे बॉल टाकायचो. एके दिवशी रव्याने मला फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे केले आणी जबरी बॉल टाकला. दुधाट्याने जोरात बॅट फिरवली व बॉल उडाला मी जिथे उभा होतो त्यापासून थोडा दुरच पडनार होता पण तो दिवस बहूदा माझा होता. एक जबरदस्त डाईव्ह मी मारली. पुर्ण अगं आडवे झाले व तो कॅच पकडला. खाली पडताना डोके मैदानावरच्या छोट्या दगडावर आदळले व रक्त देखील आले पण दुधाट्या आउट झाला होता म्हणून काही वाटले नाही. तो कॅच असाच नेहमी लक्षात राहील.<br /><br />ह्या लोकांना आज जर हे सांगीतले तर त्यांना आठवेल की नाही हे माहीत नाही पण वरच्या तिन्ही चारी घटनांनी माझ्या मनात खोलवर कूठेतरी रजिस्टर झाल्या आहेत. त्या अचानक आठवतात.<br />शाळेच्या आठवनीत एका माणसांचा उल्लेख करावाच लागेल, तो म्हणजे इंटर्व्हल मध्ये ओले चने, फूटाने, खरमूरे विकनार्याचा। त्याचे नाव आता आठवत नाही. चेहरा मात्र अजुनही लक्षात आहे. त्याचकडे आमचे खातेच होते म्हणा. तो पैसे नसले तरी उधार खरमूरे देत असे. आता माहीत नाही तो जिंवत आहे का? खरमूरेच विकतो की काय करतो ते? पण त्यानेही एक वेगळा आनंद दिला आहे हे नक्की.<br /><br />क्रमशःUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-7745701587285342732008-12-18T14:34:00.005-06:002008-12-18T14:44:15.202-06:00"स्वदेशी" विचार खरा जनक कोण?स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे जनक म्हणून महात्मा गांधीना पाहीले जाते। ते खरोखरच ह्या विचाराचे जनक आहेत का? की ह्या विचाराचा जनक दुसराच कोणीतरी आहे ह्या बाबत मी शोध घेत होतो. आणि अहो आश्चर्यम. मला बहुदा ह्या विचाराचा जनक सापडला.<br /><br />वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी "स्वदेशी" वापर करा हा विचार मांडनारा फटका लिहनारा बालक होता विनायक दामोदर सावरकर। त्याने हे पत्र प्रसिध्द ही केले होते. ह्या पत्राअंतर्गत त्याने लोकांना स्वदेशी वापरन्याची महती सांगीतली व विदेशी गोष्टी सोडून स्वदेशी आग्रह केला. ह्या फटक्यात लेखकाने जनमाणसांतील विर वृत्तीला जूने वैभव सांगून जागृत करन्याचा प्रयत्न देखील केला.<br /><br />लिखान साल १८९३<br />गांधीजी सन १८९३ ते १९१४ अफ्रिकेत असल्यामूळे भारतातील घडामोडींचा अंदाज त्यांना न्हवता तसेच तेंव्हा त्यांनी समाजकारनासाठी जिवन व्यतीत करायचे का नाही हे ही ठरविले न्हवते. शिवाय १९०५ मध्ये ही बंगालात, बंगाल फाळनी झाल्यावर मोठ्या प्रमानावर विदेशी वस्त्रांची होळी झाली होती. त्या काळी पंजाब, महाराष्ट्र व बंगालच्या मातीतून क्रांतीकारक जन्मले व समान विचारांच्या युवकांनी ह्या तिन्ही राज्यात धूम केली होती. सावरकरांनी इंग्लडात शिकत होते तेंव्हा भिकाजी कामा, वर्मा, बापट व इतरांसोबत स्वदेशीची पत्रके गुप्तरितीने भारतात पाठवीली होतीच, त्यामूळे नायरांसारखे इतिहासकार असे मानतात की सावरकरांच्या अश्या पत्रंकामूळेच दक्षिन भारतात स्टूंडट अनरेस्ट सुरु झाली.<br /><br />१९०५ मध्ये तर गांधी भारताच्या राजकिय पटलावरही न्हवते पण स्वदेशी चळवळीचे श्रेय त्यांनाच दिले जाते. का बरें? महात्मा गांधीनी तूकारामाचे विचार लोकांना सांगीतले हे आपणाला माहीत असेलच, त्यांचा वैचारिक विरोध करनार्या स्वातंत्र्यविराचा विचार ही त्यांनी पुढे नेला, पण योग्य ते श्रेय त्यांना दिले नाही.गांधी ग्रेट की सावरकर ह्या या लेखाचा मुद्दा नाही. दोघेही ग्रेटच आहेत.<br /><br />पण मग गांधीनी ही गोष्ट आम जनतेला का नाही सांगीतली हा आमचा सवाल?<br />ह्यावर अजुन संशोधन करुन इतिहासकारांनी योग्य ती दखल घ्यावी व योग्य तिथे इतिहास निट लिहीला जावा असे मनापासून वाटते.<br /><br />हा घ्या पुरावा.<br />"देशी फटका'लिखान साल १८९३<br /><br />आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा<br />हटा सोडनी कटा करुया म्लेंच्छ पटां ना धरु कदा ।।१।।<br />काश्मीरच्या शाला सोडिनु अल्पाकाला कां भुलतां?।।<br />मलमल त्यजूनि वलवल चित्ती हलहलके पट कां वरितां?।।२।।<br />राजमंहेद्री चिटा त्यजुनि विटके चिट हे कां घेतां?।।<br />दैवे मिळता वाटि, इच्छितो नरोटि नाही कां होता! ।।३।।<br />येविल सोडिनु पितांबरांना विजार करिन्यांसाठि महा ।।<br />बेजारचि तुम्ही नटावयामधि विचार करितो कोणि न हा ।।४।।<br />केलि अनास्था तुम्हिच स्वत: मग अर्थातच ती कला बुडे<br />गेले दिन हे नेले हिरूनी मेले तुम्हि तरि कोण रडे? ।।५।।<br />अरे आपणच होतो पूर्वी सर्व कलांची खाण अहा ।।<br />भरतभूमिच्या कुशीं दिप ते कलंक आतां आम्ही पहा ।।६।।<br />जगभर भरुनी उरला होता नुरला आतां यापार ।।<br />सकलहि कलाभिज्ञ तेघवां अज्ञ अतां अरिही थोर ।।७।।<br />निर्मीयली मयसभा आम्हिच ना? पांडव किरीटी आठवारे ।।<br />मठ्ठ लोकहो! लाज कांहितरी? लठ्ठ असुनि शठ बनलोरे ।।८।।<br />आम्रफलाच्या कोयीमध्ये धोतरजोडा वसे सदा ।।<br />होते जेथे प्रतिब्रम्हेंची धिक मी जन्मुनि अपवादा ।।९।।<br />हे परके हरकामीं खुलविती भुलविती वरवर वाचेने।।<br />यवहार रीती ऐशि बरोबर सदा हरामी वृत्तीने ।।१०।।<br />कामधेनुका भरतभूमिका असूनि मग कां ही भिक्षा<br />सहस्त्र कोसांवरुनि खासा पैका हरतो प्रभूदिक्षा ।।११।।<br />नेती कच्चा माल आमुचा देती साचा पक्व रुपे ।।<br />आमुच्या वरतीं पोट भरीति परो थोरि कशाची तरी खपे ।।१२।।<br />पहा तयांची हिच रित हो! भिती नसे त्या लबाडिला ।।<br />नाना कर्मे नाना वर्मे देश आमुचा लुबाडिला ।।१३।।<br />निमुली हातामधलीं फडकीं फडकत नाना ध्वज वरतीं ।।<br />हडलहप्पसे करुनि शिपाई निघत स्वारी जगभर ती ।।१४।।<br />नाना परिचे रंग भरीती रंग पुंप ते दंग करी ।।<br />मोर, कावळे, ससे, पारवे, श्वापद विचरती तीं बकरीं ।।१५।।<br />राजगृहीं गोपुरी झळकती मजले सजले त्यामधुनी ।।<br />सुंदर नारी दु:ख हर्ष भरि त्या बघित शोभा तरुणी ।।१६।।<br />नाना जाती पिकली शेती गार हिरवे वस्त्र धरी ।।<br />भात बाजरी गहूं गाजरी आच्छादली हि भूमि बरी ।।१७।।<br />अगनग गेले गगन चुंबिण्या सर्व थोरबहु कोराकि ।।<br />भास पुरुषची निजांकि बसवी स्वानंदाने पोरां की ।।१८।।<br />चित्र ऐशीं दाविति छत्रे विचीत्र तूम्हा भुल धंदा ।।<br />तुम्हिंहि भुलतां पहातां घेतां क्षणांत स्वपटाला निंदा ।।१९।।<br />याला आतां उपाय बरवा एकी करवा मन भरवा ।।<br />ओतप्रोते अभिंमाने हरवा देशी धंदे पट करवा ।।२०।।<br />परके वरवर कितीहि बोलती गोड गोड तरि मिनं समजा ।।<br />सुंदर म्यानीं असे असिलता घातिच होइल झट उमजा ।।२१।।<br />रावबाजि तरि गाजि जाहले राज्य बुडालें तरि मुख्य ।।<br />सख्य असे परि परकीयांचें गोष्ट ऋदयिं ही धरु लख्ख ।।२२।।<br />वैर टाकुं या यास्वत लौकर खैर करो परमेश्वर ती ।।<br />निश्चय झाला मागें अपुला परदेशी पट ना धरती ।।२३।।<br />चला चला जाउं या घेउं या देशि पटांना पटापटा ।।<br />जाडे भरडे गडे कसेही असो सेवुं परि झटाझटा ।।२४।।<br />ना स्पर्शू त्या पशूपटाला मउ वरि विखार तर भावूं ।।<br />घेऊं खडतर अंतीं सुखकर धर्मचि मानुनियां राहूं ।।२५।।<br />द्रव्य खाणि हि खोरे घेउनि परकीपोरें खणतिरें ।।<br />एकचिंत करुनियां गड्यांनो! वित्त जिंकूया पुररपिरे ।।२६।।<br />विश्चेश्वरि ती नारायणि ही यमहरि हर अदि सुरवरिणीं ।।<br />कर्म सिध्दीसी दावो नेउनि मोद देति निज भक्त जनीं ।।२७।।<br />दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रविज्ञान ।।<br />वरावयाला रत्न पटांनां करो आर्य ते रणदान ।।२८।।<br />कवितारूपी माला अर्पी आर्यं बंधुसीं सार्थक हो ।।<br />भक्तांकरवी मन देवांसी सेवा त्याशीं अर्पण हो ।।२९।।<br /><br />स्वांतत्र्यविर सावरकरUnknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-11256868895933475702008-12-17T15:14:00.003-06:002008-12-18T11:12:51.295-06:00रॅन्डम मेमरीज -५<p>८ वी मध्ये असताना शाळेत कोणीतरी मोठे पाहूने आले होते. मला त्यांचे नाव आता आठवत नाही, पण वर्गशिक्षकांनी य वेळा बजावल्यामूळे हे लक्षात राहिले. तर त्यांचा समोर निवडक विद्यार्थीच भाषन ठोकनारं होते. त्यात मास्तराने माझा नंबर लावला. आली का पंचाईत? निम्मीत होते स्वातंत्र्यदिनाचे.<br />मी विषय काय घ्यावा म्हणून विचार करत होतो. इतक्यात कुणीतरी सुचविले की तू सावरकर किंवा नेताजी वर बोल. हे असे सुचवने सोपे असते पण त्यांचावर तेंव्हा बोलाय इतकी अक्कल न्हवती. तशी आत्ताही नाहीच.मग अस्मादिक तयारी करायला लागले. कोणावर जास्त वेळ बोललो ते आता आठवत नाही. पण इतर घटनाच आठवतात. माझा नंबर तिसरा होता. एकून पाचच भाषनं होणार होती. पहिल्या दोघांनी बोलून घेतले. मास्तरांनी माझ्या नावाचा पुकारा केला. स्टेजवर जाण्याची ही माझी पहिली वेळ न्हवती. त्यामूळे स्टेज भिती वैगरे काही न्हवती पण त्या दिवशी काय झाले हे माहीत नाही. दोन-तिनदा केदार जोशी, केदार जोशी असे मास्तर ओरडत होते पण मी माझ्या बसल्या जागेवरून हाललो नाही. मी स्टेजपासून बराच लांब बसलो होतो त्यामूळे त्यांना दिसत न्हवतो. माझे पाय थरथर कापत होते, घाम फूटला होता आणी निघून जावे असे वाटत होते. अचानक काय झाले माहीत नाही, मी उठलो, त्या दिवशी मी काळी चड्डी घातलेली होती हे आठवते. हाताची पालथी मूठ कपाळावर व नाकावर फिरवली आणि स्टेजच्या दिशेने चालायला लागलो. तिथे जाऊन, "मी आपल्या इतिहासातिल दोन उदाहरणे तूमच्यासमोर ठेवत आहे असे सांगून नेताजी व सावरकर ह्या दोघांबद्दल बोललो बहूतेक." तयारी फक्त ६ मिनीटांची केली होती पण भाषन करताना कागद फेकून दिला आणी तसेच बोलायला लागलो. ते असंबध्द होते का न्हवते ते आठवत नाही. काय बोललो ते तर आठवतच नाही.पण कानडखेड गुरुजी नंतर जवळ आले आणी म्हणाले, "तूला भाषन निट करता येत पोरा. बापाचे नाव काढशिल."बापाचे नाव काढले की नाही हे माहीत नाही पण त्यांनी 'देता' च्या ऐवजी 'करता' म्हणलेले आजही लक्षात आहे. ती माझ्यासाठी शाळेतली अत्यूच्च आनंदाची घटना. त्यादिवशी ती थरथर झाली ती मला नक्कीच वक्ता करुन केली असे वाटते. पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर गेट मिटींग्स घेने, परिषदेत भाषन ठोकने, अन त्याही पुढे परिषदेचा एक बर्यापैकी मोठा पदाधिकारी होणे, ह्याचा पाया शाळेच्या ह्या घटनेत होता हे नक्की. </p><br /><p><br />अश्यातच कधीतरी तिने मला पेन दिला होता. ती राहायची गणेश नगरला. म्हणून मी आणी अन्या तिकडे चक्कर मारायचो. तिच्या घरासमोर जायचे कधीच धजले नाही. पण गल्लीत व आ़जूबाजूच्या परिसरातील लोक बहुदा आम्हाला ओळखायला लागले होते. रोज एक चक्कर होतीच. तसेही आम्ही अन्याकडे अभ्यासाला जायचो. अन्या देखील गणेश नगरलाच राहायचा. मी तिथून काही फार लांब राहयचो नाही. मग अन्याकडून तिकडे.एके दिवशी आमच्या वर्गातली दुसरी मुलगी मला तिथे भेटली. ती ही त्याच गल्लीत राहायची हे मला माहीत न्हवते. ती घरीच चल म्हणून पाठीमागे लागली, मग तिच्यासोबत घरी जाणे भाग पडले. तिच्या आईने चिवडा व चकल्या दिल्याचे लक्षात आहे पण दिवाळी होती का हे आठवत नाही. त्या चकल्या फारस चविष्ट होत्या. तिने मला खोदुन खोदून विचारले की इकड का आलात? पण मी ताकास सुर लागू दिला नाही. दुसर्या दिवशी ती मैत्रीन आणी ती एकत्र बसले होते. तिच्या नजरेतून मला कळले की तिच्याघरी जायची काय गरज होती?नेमके त्याच दिवशी वर्गात सेनापती बापटांवरचा धडा चालू होता. माझ्या आणि तिच्या पुस्तकात सेनापतीचे सेपानती असे प्रिंट झाले होते कारण आम्ही पुस्तके नविन घेतली होती. दुसर्यांचा पुस्तकात तो घोळ न्हवता. बाईंनी सविताला धडा वाचायला सांगीतला आणि तिने सेपानती असा उच्चार केला. बाई म्हणाले, अग चिमने निट वाच. मग ती म्हणाली की सेपानतीच तर आहे. मला काय झाले काय माहीत मी देखील उठून सेपानती आहे सेनापती नाही असा वाद घातला व जरी चूकले असले तरी वाचनात काहीच चूक नाही हे पटवून दिले. त्या दिवशी एक बोरकूटाची पुडी मला सुट्टीत मिळाली. खरी कमाई. हे बोरकुट मी कधीच खायचो नाही. पोरींना जाम आवडायचे. त्या मग वर्गात आणून शाळा संपे पर्यंत खात बसत.<br /></p><br /><p>"विद्या विनयेन शोभते"</p><br /><p><span class="">९ वीत</span> असताना एके दिवशी आम्ही मुलं इटरंव्हल मध्ये एका वर्गाचा बाजूने जात होतो। तिथे कसलासा आवाज आला। जे वर्ग बांधलेले होते त्यांना मोठ्या मोठ्या खिडक्या होत्या वर वर्गातले काय चालू आहे हे दिसत होते. तर तिथे दोन मास्तर एकमेकांना मारत होते. एका मास्तराने दुसर्यांचे डोके बेंच मध्ये घातले होते. आमच्या शाळेतील बेंच के लोखंडी होते. वर डेस्क, त्याखाली थोडी जागा, आणी परत एक लोखंडी फळी, त्यावर पुस्तकं ठेवता येईल अशी रचना होती. तर त्या मधल्या जागेत एका मास्तराचे डोके दुसरा मास्तर घालू पाहत होता. आणि ज्याचे डोके मध्ये जात होते तो. ' ओ ये ओ मेलो, मेलो" असे ओरडत होते आणि बाकीच चार पाच शिक्षक हा तमाशा पाहत होते. तो मारनार मास्तर शाळेत दारू पिऊन येतो अशीही वंदता होती. ह्या व अश्या दोन मास्तरांनी शाळेचा तमाशा केला होता व त्यांना विरोध करनारा मास्तर मार खात होता. अन त्या शाळेच्या बोर्डावर सुविचार लिहीला होता, "विद्या विनयेन शोभते". ते दृष्य अन हा विरोधाभास माझ्या डोळ्यासमोरुन कधीही जात नाही. </p><br /><p><br />आमच्या बॅच पासून शाळेला गळती लागली. ती लागनारच होती हे वरिल देखाव्यातच अधोरेखीत होते. पण आमच्या बॅच मधले माझे सर्व मित्र नंतरच्या जिवनात बरेच हूशार निघाले. काही अपवाद वगळता सर्वच जन 'सेटल्ड' आहेत. पैसे हे मोजमाप जर आपण यशस्वीपणाला लावले तर त्या मोजमापाने सर्वच यशस्वी आहेत.<br /></p><br /><p>कानडखेडकर मास्तर आम्हाला मराठी शिकवायचे कुठल्यातरी वर्गात। बहूदा दहावी किंवा नववी. त्यांची एक वेगळीच स्टाईल होती. इतर मास्तरांचे म्हणने होते की त्यांचा शाळेत शिकवने हा मूळी मूळ धंदा नाही तर जोड धंदा आहे. त्यात तथ्य असावं कारण शाळेत येन्यासाठी कधी ते बजाज स्कूटर वापरत तर कधी चक्क ऑटो रिक्शा चालवत येत. ते नेहमी शाळा सुरु व्ह्यायच्या आधी व नंतर रिक्षा चालवीत का? असे आम्हाला वाटत असे. तसेच तेव्हां काही रिक्षावाले पोरांना आणून सोडत, तसे मास्तर ही "घरापासून ते घरापर्यंत" पोरांची जबाबदारी घेत असतील काय? असाही जोडप्रश्न मनात येत असे. पण ते शिकवत मात्र चांगल. पोरांनाच सांगत, "गधडहो आज काय करायचे" मग पोर कल्ला करत आणी ते धडा शिकवायला घेत. शिकवताना इतर गोष्टींच जास्त सांगत त्यामूळे त्यांचा तास आम्हाला आवडायचा. दुसर्या आवडनार्या बाई म्हणजे कुळकर्णी बाई. ह्या दिसायला खूपच सुंदर होत्या तसेच त्यांचा आवाजही चांगला होता. त्या आम्हाला हिंदी शिकवत. त्यांनी नेहमी कविता शिकवायला घ्यावी यासाठी आम्ही गोंधळ करत असू. मग त्या निट चालीवर कविता म्हणून दाखवत व त्याचा अर्थ सांगत. त्यांनी शिकवीलेले कायम लक्षात राहायचे कारण शिकवीताना त्या उदाहरणे सांगून शिकवत. सांस्कृतीक कार्यक्रम पण त्याच घडवून आणायच्या. </p><br /><p><br />क्रमशः</p>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-47170253226724187592008-12-16T13:42:00.003-06:002008-12-19T14:08:38.642-06:00रॅन्डम मेमरीज -४आठवीला एक बाई आम्हाला मराठी व्याकरण शिकवीत. त्या बाईंचा माझ्यावर लोभ होता. एके दिवशी एक शब्द चालव असे त्यांनी सांगीतले। आणी मी त्यांना प्रतिप्रश्न केला की, ' बाई शब्दांना चालविन्यापेक्षा मी चालून दाखवू का?' मी असे म्हणाल्याबरोबर त्या म्हणाल्या, ' हो बाळा, निट वर्गाबाहेर पर्यंत चालून दाखव बरं?' अन माझी पहिल्यांदाच वर्गातून हकालपट्टी झाली.<br /><br /><br />वर्गातून काढल्याबरोबर मी पाणी पिन्याचा हौदाकडे जायला लागलो। तिथे विनोद अन आणखी कुणीतरी दिसले. त्यांचा हातात बहुदा थम्प्स अप च्या बाटल्या होत्या. त्यांनी मला बोलाविले अन त्यांचातील दोन घोट दिले. शाळेत थम्स अप पिऊन मी काही तरी बाजी मारली असे मला वाटले होते तेव्हां. तसाही त्या पोरांशी माझा संपर्क कधीच जास्त न्हवता. आमच्या वर्गाची संख्या ४५ ते ५५ असावी बहूदा. माझा नंबर काय ते ही मला आता आठवत नाही, पण कूठल्या तरी वर्षी तो १४ होता. आमच्या वर्गात १६ ते २० मूली असतील. त्यातल्या फक्त ४ ते ५ च बघनेबल होत्या. बाकी नुस्ता आनंदच. त्यातही काही मूलींचे नाव तर सत्यनारायण पुजेतील होते. कलावती म्हणून एक मुलगी होती. दरवेळी सत्यनारायणाच्या पोथीतील हे नाव ऐकून मला असे वाटायला लागले की पुढच्या वेळी सत्यनारायन तिला आमच्या घरी धाडतो की काय? ती दिसायला फार भयान होती बहुदा, कारण आम्ही तिच्याकडे कधीच बघायचो नाही. मात्र एके दिवशी मी आणि मिल्या शाळेत पायी पायी जात होतो, चालत जाता चाळा म्हणून मिल्या पायाने दगड उडवित होता, नेमका एक दगड ह्या साळकायांना लागला व त्या आमच्याकडे वळून बघू लागल्या. मिल्याने पटकन चेहरा मागे केला पण मि समोरच पाहत होतो. त्या तिथेच थांबल्या, आम्ही येईपर्यंत. मला वाटले की ती कलावती आता तक्रार करनार पण तीला बहुतेक ते आवडले असावे, कारण नंतर ति चार पाच दिवस मिल्याकडे बरेचदा बघत होती.<br /><br /><br />अशातच एकत्र अभ्यास ही टूम निघाली आणि अन्याने जाहिर केले की सर्व जण त्याचा कडे जाऊन अभ्यासाला लागतील। रव्या सामिल होणार न्हवता कारण तो लांब राहायचा. मिल्या पण नाही कारण त्याला अभ्यास नकोसा वाटायचा. उरलो मी आणि शिन्या. आम्ही हो म्हणालो. अन्याच्या घरा शेजारीच आनंद, अभय व इतर लोक राहायचे. अशातच कमल्याची पण घसीट झाली होती. हे सर्व लोक 'अ' वाले होते. त्यांची अभ्यासाची पध्दत आमच्या पेक्षा थोडी वेगळी होती. ते जोर जोरात वाचन करुन अभ्यास करत, तर मला अन शिन्याला मनातंच वाचायची सवय होती. मग अभ्यास काही होईनासा झाला. घरुन निघायचो अभ्यासाला पण अभ्यास न करताच नुस्ता धिंगाना घालून वापस यायचो.<br /><br /><br />इग्रंजीची ट्यूशन एका मास्तर कडे लावली. त्यात मी, केश्या, कमल्या, अभय वैगरे मंडळी आमच्या शाळेची होती. त्या सरांची मुलगी पण आमच्याच वर्गात असल्यामूळे ट्यूशनला बसायची. ती खुप सुंदर होती. अगदी रेखीव. तिच्याकडे एक दोघ बघत बसायचे. बघन्यामूळे इंग्रजीची फक्त फिसच दिल्या गेली आणी इंग्रजीत बोंब झाली त्यांची.<br />त्याकाळी आमच्या वर्गातल्या दोन मूलींनी माझ्या वह्या मागायचे सत्रच लावले होते. एकतर मी जास्त काही अभ्यास करायचो अशातला भाग न्हवता, तसेच अन्या वा रव्या सारखा हूशार होतो असाही भाग न्हवता. पण शाळेतल्या सर्व कार्यक्रमांमध्ये मी भाग घ्यायचो, त्यामूळे नंबर निघायचा व बक्षिस मिळायचे. पण तेवढ्यावरून कोणी सतत वह्या घेतील असे वाटत न्हवते. अन्या ने नंतर सांगीतले की एक मूलगी तूझ्यावर लाइन मारते. त्या 'शाळा' लेखात तिचा उल्लेख आला आहेच. ते गुलाबी पाण तिथेच सोडून पुढे जाऊयात.<br />माझे परिक्षेबाबत मत ठरलेले होते। की तिथे जायचे, पास होण्यापुरते मार्क मिळवायचे व पेपर देउन उठायचे. आमच्या मातोश्रींचा ह्याला विरोध होता. मी आठवी नंतर ६० मार्कांच्या वर पेपर लिहायचो नाही व त्यातले ५२ ते ५६ मार्क मला मिळायचे. मी आईला म्हणायचो की मला ९० टक्के मार्क मिळाले. आई म्हणायची तूला ५२-५५ टक्के मार्क मिळाले. त्यावर मी तिला म्हणायचो की टक्के हे टक्यांमध्ये बघ. मी फक्त ६० मार्कांचाच पेपर सोडवतो कारण मला तिथून उठून येऊन क्रिकेट खेळायचे असते आणि त्यातले मला ५२-५५ मिळतात. ह्यावर समाधान होत माझ. ही टक्केवारी इतरांपेक्षा स्वतःला कळायला पाहीजे. हवे असल्यास ते पेपर तू आणून पाहा. तिला ते पटायचे नाही. पण मी कधीही परिक्षा देताना पास होईल हे कळल्यवर पेपर देऊन ऊठत असे. त्यात आजही खंड नाही. मला स्वतःला कळले तर बास हेच माझे धोरण. इतरांना का मी पटवायला जाऊ, मी किती हूशार आहे ते? ज्यांना फक्त हूशार लोकांशीच संपर्क साधायचा असतो, त्यांना साधूदेत. आपण परिक्षार्थी नाही. पटत नसल्यास भारतीय इतिहास मला विचारून पाहा आणि ज्याला १० वीत १०० पैकी ९० मार्क मिळाले त्याला विचारून पाहा. माझ्या ह्या धोरणामूळे (इतरांकडे पाहन्यापेक्षा स्वतःकडे पाहा) माझा फायदाच झाला व अनेक गोष्टींचा अभ्यास खोलात करायची सवय लागली.<br /><br /><br />क्रमशःUnknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-55735805263715603452008-12-15T16:09:00.004-06:002008-12-16T13:37:50.755-06:00रॅन्डम मेमरिज -३त्या काळी अस वाटायंच की क्रिकेट असताना शाळा का? (अजूनही अस वाटतंच फक्त आता ऑफीस का? हा प्रश्न पडतो).<br />रव्या, मी आणि मिल्याने धडपड करुन आमची एक टिम तयार केली. मिल्याकडे त्याच्या पूण्याचा मामाने दिलेली एक जड बॅट होती. ती खरीतर पुर्णाकृती माणसासाठी होती पण आम्ही अर्धवट तयार झालेली माणसं ( पक्षी, लहान मूल) ती बॅट वापरू लागलो. तिला स्ट्रोक भरपूर आहे, आणी त्या स्टोक मूळे माझे फोर जास्त जातात, त्यात माझी अक्कल काही नाही असे मिल्याचे नेहमी म्हणने होते. कारण मिल्याच्या बॉलींग वर सर्वात जास्त फोर्स मी मारल्या आहेत. टिम काही आमच्या ३ नी तयार होणारी न्हवती. म्हणून मग सदस्य संख्या वाढवावी लागनार होती. अश्यातच सहावी चालू असतानाच मध्येच 'क' मध्ये एक मूलगा भरती झाला. राधवेंद्र व्हाय व्ही अर्थात रघ्या किंवा वायव्ह्या. हा देखील होता दक्षिनेतला, पण पक्का मराठी. यवतमाळ की अकोल्याहून आमच्या शहरात त्याचा वडिलांची बदली झाली. रघ्यालाही आमच्या सारखाच क्रिकेटचा नाद असल्यामूळे व शाळा बूडविली म्हणजे आपण काही घोर पाप केले असे वाटत नसल्यामूळे तो आमच्यात सहज मिसळून गेला. तो देखील चांगली बॉलींग करायचा. मग हळूहळू इतर लोक सामिल झाले, ज्यात दुसरा एक रव्या, रव्या वाघमारे, जो चांगली बँटीग करायचा, आनंद, अभय वैगरे वैगरे. अन्या आणि शिन्या जरा क्रिकेट पासून लांबच राहीले. म बघता बघता आमची टिम मस्त तयार झाली. व शाळा बूडवून क्रिकेट खेळू लागली.<br /><br />आम्ही सर्व सिझन बॉलने म्हणजे लेदर बॉलने क्रिकेट खेळायचो, इतर मुलांसारखे रबरी बॉलने क्रिकेट मी कधी खेळले नाही. प्रश्न होता निट बॅट, स्टम्प व इतर साहीत्याचा. वर्गनी गोळा करायचे ठरल्यावरही सर्वांचेच पालक काही पैसे देनारे न्हवते. मग अस्मादिकांनी एक शक्कल लढवली.<br />झाल काय की माझ्या आईचा पगार झाल्यावर एक दोन दिवसांनी आमच्या कपाटात भरपुर पैसे ठेवलेले दिसत। कपाटाला कूलूप कधी धातले जात न्हवते मग, म्या पामराने ते पैसे आई वडिलांना न सांगता क्रिकेट साठी एक दोनदा उचलले तर त्यात माझा काय दोष? अश्या एक दोन चोर्या मी पचवल्या व क्रिकेट किट आणले. तेव्हां १५० रु ला डि ऐस सीची चांगली बॅट मिळाली व एक दुसरी बॅट २६० च्या आसपास मिळाली. साल होते १९८५. आईच्या पगारात क्रिकेटचे साहीत्य तर दोनच दिवसात आणले, पण असे साहीत्य आणले तर घरी ठेवनार कसे हा प्रश्न आम्ही सर्वांमध्ये साहीत्याची वाटनी करुन सोडविला. साहित्य माझे पण माझ्याच घरी आणायला चोरी. <br /><br />आई वडिलांना ते पैसे मी चोरले असतील असा संशय आला नाही. चोरी पचली. पण त्यांनी घराला कुलूप लावून किल्ली न्यायला सुरुवात केली. आमच्या शेजारचे दोन्ही घर माझ्या काकांचेच असल्यामूळे आम्ही मूल कूठे राहनार ह्याचा प्रश्न न्हवता. त्यांना असे वाटले की आम्ही घर उघडे ठेवल्यामूळे कोणी तरी येऊन चोरी करुन गेले. आता आली का पंचाईत? अजुनही पॅडस आणायचे होतेच. मग हळूच संधी साधून कधीतरी किल्ली काकांकडे असताना मी परत पैसे चोरले. पण ह्यावेळी अलगद पकडले जाऊ असे मनातंच आले नाही. मग काय आधी कांकानी, मग आई वडिलांनी आमच पार भजं करुन टाकलं. ओल्या फोकाने मार मिळाला. तेंव्हा ठरवल पैसे समोर दिसले तरी घ्यायचे नाही. अजुनही हजारो रु समोर ठेवले तरी आमच्या मनात वाईट विचार येत नाही, ह्याच पुण्य आमच्या वडिलांबरोबरच आमच्या काकांना आहे, ज्यांनी कन्हेरीचा फोक आणि पंख्याची वायर तोडून तयार केलेला फोक, आमच्यावर यथेच्छ चालवीला.<br />त्या तिन चोर्या सोडल्या तर आयूष्यात नंतर कधीही चोरी केली नाही।<br /><br />ह्या घटनेवरून तूम्ही, आजचा मी कसा आहे हा अंदाज बांधू नका पस्तावाल। कारण लहानपनीच्या घटना वेगळ्याच असतात। ज्यातनं आपल जीवन घडत जात.<br /><br />तर क्रिकेट मुळे अभ्यासात दुर्लक्ष व्हायला सुरु झाले होतेच. शिवाय आमच्या मास्तरांच आमच्या कडे फारस लक्ष नसावं असे आज वाटते. कारण आमच्या वर्गशिक्षीका एकताटे बाई, वर्गात यायच्या व दोन मिनीटांनंतर स्वेटर विनायला घ्यायच्या किंवा गवारीच्या शेंगा निवडत बसायचा. मला अजुनही आठवत नाही की त्या आम्हाला कोणत विषय शिकवायच्या. बर हे फक्त त्यांचाच बाबतीत नाही तर इतर अनेक सर नेमके 'क' आणि 'ड' ला कोणते विषय शिकवायचे, हे त्यांना तरी माहीती होते का हे माहीत नाही.<br />एक सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे। ते एकदा वर्गशिक्षक होते. त्यांनी अशी टूम काढली की मागील वर्षीचा पहिला जो कोणी आहे तो वर्गप्रमूख. मग रव्याशिवाय कोण असनार. म्हणून रव्या आमचा मॉनीटर झाला. ते सर धोतर घालायचे व बरेचदा त्यांना शिकवता शिकवता, खूर्चीत रेलून पाय टेबल वर ठेवायला आवडत असे. एकदा असे करताना काही तरी घोळ झाला वर सरांचे विश्वदर्शन समोरच्या काही मुला-मूलींना दिसले. त्यामूळे वर्गात जो घोळ झाला व जो हास्य्फोट झाला तो त्यांना स्वतला काही कळेना. मी पाठीमागे बसल्यामूळे मला नेमके काय झाले हे कळलेच नाही पण काही मुलांनी हे तास झाल्यानंतर सांगीतले त्यामूळे कळाले. पण सरांनी टेबलवरून जोरात पाय काढून घेतला व काही मूलांना वर्गाबाहेर जायला सांगीतले एवढ्यालाच मी साक्षीदार.ह्या रव्याला त्यांनी मॉनीटर केले होते. एकदा कोणाचा तरी तास ऑफ होता. मग रव्या फळ्यापाशी जाऊन आरडा ओरडा करनार्यांची नाव लिहून घेऊ लागला. एक सर्पे नावाचा प्राणि आमच्या वर्गात होता. तो फार आवकाळी होता, असे सर्वांचे म्हणने म्हणून कोणी त्याचा नादी लागत नसत. त्या सर्प्याचे नाव रव्याने फळयावर लिहीले. तो उठला व त्याने ते नाव पुसले. परत रव्याने लिहील, परत ह्याने पुसले असे दोन तिनदा झाल्यावर सर्प्याने भरवर्गात रव्याची गच्छी ( गच्छी म्हणजे कॉलर) पकडली व त्याला ढकलले. तो आणखी मार खाणार इतक्यात ते सर वर्गात प्रवेश करते झाले. त्यांनी हे सर्व बहुदा येताना पाहीले. 'मॉनीटर कोणे'? असा प्रश्न त्यांनी केल्यावर रव्या मी सर म्हणून त्याचा जवळ गेला. रव्या तिथे पोचताच सरांनी रव्याच्या श्रिमूखात लावून दिली, मूर्खा वर्ग सांभाळता येत नाही तर मॉनीटर कशाला झालास? असे जोरात विचारले. आधीच त्या सर्प्याने त्याला पिडले होते, त्यात जोरात कानशिलावर बसली, जे व्हायचे न्हवते तेच झाले आणि रव्याचा चड्डितून धार लागली. रव्या वर्गात मूतला. नंतर अनेक दिवस रव्याला लोक चिडवत होते पण आम्हाला त्यावर काहीही करता आले नाही. रव्या आमच्यावर खूप रागात आला व मी अन मिल्या बॅटींग करत असलो तर जोराने पायावरच बॉल टाकू लागला. एक दोन महिन्यांनंतर हे सर्व निवळले.<br /><br />क्रमश:Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-42903361564137615632008-12-14T13:11:00.003-06:002008-12-15T09:24:30.038-06:00रॅन्डम मेमरिज -२<div>आमची शाळा म्हणजे मूर्तीमंत पार्शलिटी असेच वर्णन आम्ही करायचो.</div>
<br /><div>पाचवीत जेव्हां प्रवेश घेतला तेव्हां शाळेकडे नविन वर्गच न्हवते म्हणे! <span class=" transl_class" id="1" title="Click to correct">मग</span> त्यांनी काय शक्कल लढवावी? तर शाळेचे म्हणून जे मैदान होते तिथेच तात्पुरते वर्ग उभे केले. तट्टे आणि पत्र्यांचे. <span class=" transl_class" id="2" title="Click to correct">आणि</span> सर्व 'क' आणी 'ड' तूकड्यांना तिकडे बसायची सूवर्णसंधी उपलब्ध करुन <span class=" transl_class" id="5" title="Click to correct">दिली.</span> <span class=" transl_class" id="4" title="Click to correct">हे</span> पाच सहा <span class=" transl_class" id="3" title="Click to correct">तट्ट्याचे</span> वर्ग म्हणजे धिंगाना करन्याची जनू <span class=" transl_class" id="6" title="Click to correct">पर्वनीच.</span> माझ्यातला 'अभ्यासू' <span class=" transl_class" id="7" title="Click to correct">केदारला</span> तात्पूरते म्हणजे १० <span class=" transl_class" id="0" title="Click to correct">वी</span> पर्यंत मारन्याचे कार्य निश्चीतच ह्या वर्गांनी <span class=" transl_class" id="9" title="Click to correct">केले.</span> <span class=" transl_class" id="8" title="Click to correct">मूळातच</span> मी उचापती माणूस. चार लोक मिळाले की बांध संघटणा, हे तेथूनच चालत आले आहे. <span class=" transl_class" id="12" title="Click to correct">मग</span> काय ऑफ पिरेड मध्ये ते तट्टे <span class=" transl_class" id="10" title="Click to correct">फाडून</span> टाकने, त्यातून छिद्र तयार करने व दुसर्या 'ड' वर्गातील मूलांशी <span class=" transl_class" id="11" title="Click to correct">खूश्कीचा</span> मार्ग बांधने ह्याची जबावदारी मित्रमंडळाने माझ्यावर टाकली। ती जवाबदारी मी व आणखी एका सहकार्याने विना तक्रार स्विकारली व यशस्वी पणे पार पाडली. त्याच वर्गात आम्ही चार-पाच वर्ष काढली. वाटल तो पर्यंत तरी शाळेत आमच्या नावाचे वर्ग तयार होतील पण नाही. त्या तयार वर्गात बसन्याच्या जन्मसिध्द हक्क फक्त सर्व वर्गांचा 'अ' आणि 'ब' तूकड्यांनाच होता असे दिसते. पण १० वी ला मेरीट मध्ये मात्र 'ड' मधिल मूलगी आली. तसेही 'अ' वाले फार सोवळे आहोत असे दाखवायचे पण कूठल्याही कार्यक्रमात त्यांचा पहिला नंबर कधीही आला नाही. वक्तृत्व आणी निंबधलेखण मध्ये बरेचदा आमची तूकडी पहिली तसेच क्रिकेट मध्ये आमचीच टिम पहिली यायची.</div>
<br /><div> </div>
<br /><div>शाळेचे मैदान अश्या रितीने वापरल्यामूळे खेळाच्या तासाची बोंबच झाली. शाळेच्या पाठीमागे रेल्वेस्टेशन आहे. रेल्वे बोर्डाची एक पडिक जमीन मग शाळेने मैदान म्हणून वापरले ते ही आमच्या १० वी पर्यंतच नंतर रेल्वेने मनाई केली. आधी लिहील्याप्रमाने वर्ग तट्याचे असल्यामूळे, पिरेड चेंज होताना जर पळून जावे वाटले तर खूशाल तट्टा वर करायचा व रेल्वे ग्राऊंड कडे पळ काढायचा. मुख्य रस्ताने जायची गरजच न्हवती. आणी वर्गात बसल्यावरही लक्ष सारखे त्या रेल्वेच्या मैदानाकडेच असायचे सर्वांचे कारण कूठल्याना कुठल्या तूकडीचा खेळायचा तास असायचा. मग आम्ही तिकडे टक लावून बघत <span class=" transl_class" id="13" title="Click to correct">बसायचो</span>.</div>
<br /><div> </div>
<br /><div>एकदा, बहुदा सहावीत किंवा सातवित गणिताचे मास्तर कुठलातरी प्रमेय सांगत होते. त्रिकोन काढते वेळी मी आवाज काढायला सुरु केली. म्हणजे त्या सरांची त्रिकोन किंवा चौकोन काढायची एक विशीष्ट पध्दत होती. आधी ते फक्त फळ्यावर टिंब काढीत मग ते जोडीत. त्यांनी एका टिंबापासून दुसर्या टिंबापर्यंत रेषा काढायला सुरुवात केली की मी उंsssउं असा आवाज काढायचो. दोन तिनदा त्यांना बिलकूल लक्षात आले नाही. नंतर हरिष नावाच्या पठ्याने त्यांना सांगीतले की मी तो आवाज काढतोय. त्यांनी एक तूटलेला लाकडी बेंच होता त्याची फळी काढली व आमची स्वच्छ व यथेच्छ धूलाई केली. वर आता माझ्या गणिताचा तासाला कधीही बसायचे नाही असे फर्मान काढले. मी निर्लज्ज पणे, चालेल सर, हो सर, असे उत्तर दिले व मार खुप बसल्यामूळे सुट्टी घेउन घरी निघून आलो.</div>
<br /><div> </div>
<br /><div>घरी येतानाचा डोक्यात चक्रे सुरु झाली. हर्याला बदडायचा. मग निवांतपणे दोन चार दिवस जाउ दिले. हर्या शाळेपासून जवळ राहायचा. एके दिवसी मोर्या (म्हणजे मोरे) म्हणला की आपण हर्याकडे डब्बा खायला जाऊया. शिन्या म्हणाला हिच संधी आहे केद्या साधून घे. हर्याच्या घराजवळ जाताना एक गटार लागते. ते सर्वकाळ उघडेच असायचे. हर्यासोबत घरी तर निघालो पण गटार आले की त्याला तिथे ढकलून दिला. ते गटार खोल न्हवते, नाली होती. पण काळे पाणि सगळीकडे साचले होते. हर्याचे कपडे काळे झाले आणी तो रडायला लागला. तिथेच त्याला मी अन शिन्या बूकलत होतो, पण नंतर दया येउन सोडून दिले व त्याला वर काढले. हर्याला आणि मोर्याला कळले की मी अन शिन्या असे का वागलो ते. नंतर ते दोघेही आमच्या वाटे जाईनाशे झाले. </div>
<br /><div> </div>
<br /><div>इतर वेळी आपण बरं, आपल्या थोड्याफार खोड्या बर्या आणी कधी मधी केलाच तर अभ्यास बरा असे आमचे वागने होते। क्रिकेटचा नाद मला, मिल्याला व रव्याला प्रचंड होता. रव्याचा थ्रो पार लाबूंन देखील स्टंप पाशी यायचा. त्याचा आर्म आणी स्पिन बॉलींग सॉलीड होते. आम्ही तेव्हां प्रोफेशनल क्रिकेट खेळायचो. म्हणजे मोठ्या मैदानात जाऊन. आमच्या शहरात यशवंत कॉलेज नावाचे एक महाविद्यालय आहे. त्यांचे मैदान हे खुप म्हणजे खूपच मोठे आहे. सर्व लिग्ज तिथे खेळायच्या. नाही म्हणलं तरी निदान ५० यार्डाची बॉन्डी असेनच. तिकडे लॉन्ग ऑन ला रव्या थांबायचा, नाहीतर त्याची दुसरी जागा म्हणजे फॉरवर्ड शॉर्ट लेग. जबरा फिल्डींग करायचा. आधी लिहील्याप्रमाने तो खूपच बारीक होता. पण थ्रो म्हणजे राजे उच्च होता उच्च. उजव्या हाताने तो थ्रो करताना शरिराला एक हलकाचा लचका देउन वर उचलायचा, मग डाव्या पायाने दोन छोट्या उड्या घेत तो थ्रो करायचा. त्याचे पाहून मी ही तसे करायचा प्रयत्न करायचो, पण नाही जमायचा. मिल्या म्हणजे फास्ट बॉलर व बॅटींग साठी पिंच हिटर. तो डाव्या हाताने अशी काही बॉलींग टाकायचा की ज्याच नाव ते. तेव्हा देखील तो इन स्विंग मस्त करु शकायचा. त्याचा रनअप बघूनच कदाचित पुढे 'रावळपिंडी ऐक्सप्रेस' ला प्रेरणा मिळाली असावी. तो लांबून पळत यायचा पण जवळ आला की स्लो व्हायचा. हे अजब रसायन मला तेव्हां कळले न्हवते. पण बॉलींग लय सॉलीड.</div>
<br /><div> </div>
<br /><div>मी तेंव्हा (आणी अजुनही) बॉलींग, बॅंटीग दोन्ही करायचो। ओपनर म्हणून जाने मला आवडायचे. तर बॉलींग साठी सेमी फास्ट बॉलर होतो तेव्हां. पण जसे जसे वय वाढायला लागले, तसा तसा माझ्या बॉलींग मध्ये जोर जास्त आला. आता इथे अमेरिकेत प्रो लिग्स कडूनही फास्ट बॉलर म्हणून खेळतो. बँटीग मध्ये स्वतः काय स्वतःची स्तूती करायची. शाळेत एकदा सेन्चूंरी लावलीये साहेबा. नंतर देखील लै रन काढून झालेत. ह्या मॅचेस बद्दल पुढे सविस्तर येईलच.</div>
<br /><div> </div>
<br /><div> </div>
<br /><div> </div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-3632250891901365582008-12-12T15:15:00.005-06:002008-12-12T15:50:50.813-06:00रॅन्डम मेमरिज १लहानपणी च्या आठवनी हळू हळू धुसर होत चालल्यात। त्या <span class="">काळी मजेशीर</span> वाटनार्या गोष्टी आता तेवढ्या मजेशीर वाटत नाहीत हे खरेच पण त्याच गोष्टींनी तेव्हां आनंद दिला होता म्हणून त्याची परत उजळनी. मला खर तर इतर लोकांसारख शाळेतल सर्व आठवत नाही. पण जे काही रॅन्डमली आठवतंय ते लिहावे म्हणतोय. उद्या मी खरच भारताचा पंतप्रधान झालो तर पुस्तकं लिहीताना बरें. कसें? :)<br /><br /><br />हां। तर काय सांगत होतो की माझी सर्वात जूनी शाळेतली अजुनही लक्षात असलेली आठवन म्हणजे मिल्याचे अन माझे भांडन.<br /><br /><br /><br />हा मिल्या (पक्षी, मिलींद देशपांडे) माझा लै म्हणजे लै जुना मित्र २ री मधाला. आमच्या दोघांचा उंचीमूळे शाळेत आम्हाला मागे बसविन्यात आले. दोघेही एकत्र बडबड करायचो. एके दिवशी बहुतेक जरा जास्तच बडबड वा आगावूपना केला. घोरबांड सरने उठा म्हणून सांगीतले. हा मास्तर मारकूट्या होता. कोणालाही मारायचा. त्याची एक वेगळी पध्दत होती, ती म्हणजे बोटांमध्ये पेन अडकवून वरची बोटं खाली दाबायची आणि खालची वर. च्यायला, जाम दुखायचं नंतर. पण त्याचीही सवय करुन घेतली पुढे. :) तर ह्या दिवशी मास्तर ने शक्कल लढविली व बाकावर उभे केले. मिल्या अन मि दोघेही उभे राहीलो. दोन पाच मिनीटांनंतर त्याने सांगीतले, 'आता तूमची शिक्षा म्हणजे तूम्हीच एकमेकांना थोबाडीत मारा'. ऐ जोशी तू मार रे पहिले असे ते करवादले. म्हणलं मारतो सर. मिल्याच्या जुन्या मैत्रीला जागून मी मिल्याचा थोबाडीत अगदी हळूच चापटी मारली. वाटलं मिल्याही तसेच करेन. अन तिझेच माझे चूकलेना भौ. मिल्याने मैत्रीला न जागता, जोरात माझ्या थोबाडित लावून दिली. गाल लाल लाल झाला असनार. त्याचा कडे रागाने पाहत खाली बसलो. म्हणलं साल्या तूला बघून घेतो आता. पुढे काय केले ते आठवत नाही पण नंतर मोठेपणी मिल्याने खुपदा मार खाल्ला माझ्याकडून. (ऑफकोर्स प्रेमातच).<br /><br /><br /><br />मी आईच्याच, शिवाजी प्राथमिक शाळेत, पहिली ते चौथी होतो. ४ थीला पोफळे बाई विज्ञान शिकवायच्या. त्यांनी बहुदा मला बाष्पीभवन म्हणजे काय हे विचारले, मला पुस्तक घेतल्याबरोबर ती सर्व वाचून काढायची सवय होती, मग ते गणिताचे का असेना मी पुर्ण पुस्तकावर नजर फिरवायचोच. बहुदा ते बाष्पीभवन माझ्या लक्षात राहीले अन मी ते चटकन सांगीतले. पोफळे बाईंना माझ्याबद्दल आदर वाटला बहुतेक कारण त्यांनी अजुन बाष्पीभवन शिकवलेच न्हवते. लगेच त्या वर्ग अर्धवट सोडून आईकडे गेल्या व म्हणाल्या, 'मंगल, तूझ्या पोराला चौथी स्कॉलरशिपच्या परिक्षेला बसव', आईने फॉर्म भरला. अन परिक्षा द्यावी लागली. वेगळा अभ्यास केला का ते आठवत नाही पण तेव्हा चौथी बोर्डाला जिल्यात मी पहिला आलो. शाळेत अजुनही बोर्डावर जून्या हुशार विद्यार्थ्यांचा यादीत नाव आहे. माझ्या आयूष्यात पहिलेंदा व शेवट्यांदा मी जिल्ह्यात पहिला आलो होतो. शाळेने सत्कार केला व स्कॉलरशिप मिळाली.<br /><br /><br />तेव्हां नुकताच बालाजी आसेगावकर आमच्या वर्गात आला होता. चौथीला त्याची मुंज झाली होती. तो शाळेत ती काळी टोपी घालून यायचा. आम्ही (मी अन मिल्या) त्याची टोपी नेहमी उडवायचो. लगेच नंतर कधीतरी माझीही मुंज झाली पण लोक टोप्या उडवतात म्हणून मी तसाच शाळेत यायचो. टोपी न घालता. चिडवायला लोकांना काही मिळालेच नाही.<br /><br />पुढं <span class="">शाळा बदलली.</span> त्याकाळी आमच्या शहरात 'पिपल्स हायस्कूल' ही शाळा फार गाजलेली होती. ती पाचवी ते दहावी होती. आई वडिलांनी मला त्या शाळेत घालायचे ठरविले. पण त्या शाळेत प्रवेशच मिळायचा नाही. एकेक वर्ष आधीपासूनच बहुदा शाळा 'बूक' असायची असे आम्हाला तेव्हां वाटले. माज्या मावशिचे यजमान देखील त्या शाळेत शिकवायचे. आठवडाभरच्या अथक मेहनतीनंतर मला त्या शाळेत प्रवेश मिळाला. आणी मी ५ वी 'क' मध्ये भरती झालो. दुसर्या शाळा सुरु झाल्या होत्या.<br /><br /><br />ही शाळा नविन, इथे लोकही नविन, कोणाची मैत्री नाही, अशा विचारात मी दुसर्या दिवशी ५ वी क मध्ये पाऊल ठेवले अन तिसर्याच बाकावर मिल्याला पाहीले। धत तेरेकी. च्यायला, ह्या मिल्याने मला का नाही सांगीतले ह्याचा राग आला पण तो विरघळूनही गेला.ह्या शाळेत परत एकदा मी आणि मिल्या होतोच सोबत. ही मोठीच जमेची बाजू होती, तसेच बोर्डात जिल्ह्यात पहिला आलाय, लक्ष ठेवा, मटेरिअल आहे. हे बहुदा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्या वर्गातिल शिक्षकांना सांगीतले होते. त्यामूळे प्रत्येक शिक्षक त्या दिवशी येउन विचारी केदार जोशी कोण आहे? मग माझी वरात निघायची त्या शिक्षकापर्यंत. पण त्यामूळे एक बरे झाले की माझे नाव वर्गातील सर्वांना कळाले. व इतर लोक आपणहून माझ्याकडे आले. नंतर मला हे ही लक्षात आले की, शाळाच ५ वी पासून सुरु होते मग सर्वच जण नविन असनारकी. मग काय, नविन मित्र जमविने सुरु झाले.<br /><br /><br />तिसरे दिवशी एक बारिकसा मुलगा वर्गात उशीरा आला. त्याने पत्रकार घेतात तशी झोळीचे दफ्तर आणले पण ती झोळी उभी न घालता जानव्यासारखी घातली होती त्यामूळे तो अजुनच 'बाळू' दिसत होता. तो आला अन गपचूप आमच्या समांतर असनार्या बाकावर बसला. तिथे बसून त्याने एक वही काढली वर शिक्षक सांगतील ते टिपून घेऊ लागला. मधल्या सुटीत त्याला नाव विचारले. त्याने सांगीतले, 'रवि गोंधळेकर'. रव्या. मी, मिल्या, रव्या अशी जोडी नक्की झाली. बाकीचेही मित्र होते पण आता त्यांची दखल घेन्याइतके काही राहीले नाही. रव्या हूशार होता, मला लोकांनी हूशार केले होते आणि मिल्या ना धड हूशार, ना धड बुध्दू. अशी आमची जोडी अजुनही टिकून आहे. रव्याशी आता संपर्क कमी आहे पण अजुनही मित्रंच. ह्या तिघात आणखी तिन चारची मित्रांची भर पडली.<br /><br /><br /><br />बालाजीला नंतर शाळेत पाहिले. त्याला विचारल्यावर कळले की ही त्याचाच वडिलांची शाळा आहे. आसेगावकर मास्तर शाळेत आहेत त्यांचे हे सुपूत्र. मिल्या अन मि थोडे घाबरलो होतो. वाटलं बालाजी आता बदला घेणार. पण तसे काही झाले नाही त्यामूळे बालाजी पण गँग मध्ये काठावरुन सामील झाला. काठावरुन का तर तो 'अ' मध्ये होता व आम्ही 'क' मध्ये. बाल्या हूशार होता ह्यात वादच नाही. आपण बरे, आपला अभ्यास बरे अशा घासू मुलात बाल्या होता. मास्तरांच नाव काढल पठ्याने. डॉक्टर झाला. कधी मधी भेटायचा पण आता आमच्या परदेशी असनार्या वास्तव्यामूळे कोणाचीच भेट होत नाही. बाल्याच्या गमती नंतर येतीलच.<br /><br /><br />पाचवी कधी गेली हे कळलेच नाही. मला पुढचे काही आठवत नाही.<br /><br /><br />नंतरची आठवन आहे सहावीची. तिथे आमच्यात दोन <span class="">तिन साथीदार </span>भरती झाले. पहिला होता. अन्या. अनिरुध्द असे चांगले नाव आहे त्यांच. अन्या थोडा घूमा माणूस आहे. अबोल. एकटाच राहनारा. पण आमच्यात मिसळला. शिन्या नावाचा (पक्षी: श्रिनीवास हरिपुरी) एक अफ्रिकेतल्या जंगलातला केसाळ प्राणि आमच्यात सामिल झाला. त्याचे केस म्हणजे काळ्या लोकांना जसे कुरळे केस असतात तसे आहेत. एकदम दाट अन कुरळे. रंग ही काळाच. त्यामूळे तो अफ्रिकन सफारीतला वाटायचा. शिन्या, अन्या, मिल्या, रव्या अन मी ही आमची कोअर टिम झाली. त्यातही शिन्या, अन्या अन मी व रव्या, मिल्या अन मी अश्या जोड्या होत्याच. ह्या दोघांना त्या दोघांशी जोडन्याचे काम माझेच होते अन अजुनही आहे. अन्या पण हूशार. त्याला कायम सगळ पाठं असायच. आमच्या पुर्ण ५ वर्षात 'क' हा वर्ग 'अ' आणी 'ब' पेक्षा पुढ होता त्याला कारण म्हणजे हे रव्या अन अन्या. एक दोन पोरीही हूशार होत्या पण त्यांचा नंबर ३ नंतर सुरु व्ह्यायचा, पहिले काही वर्ष म्हणजे सातवी पर्यंत मी देखील पहिल्या काही नंबरात यायचो. पण नंतर क्रिकेटचे वेड लागले ते अजुनही आहेच. अभ्यास वैगरे सर्व नंतर.<br /><br /><br />सातवीत असताना कधी तरी शिन्याला त्याचा आडनावा (हरिपूरी) वरुन सदाशिवने की तूझी पुरी हिरवी असेच काहीतरी चिडवले. शिन्या दिसायला जरी अफ्रिकन असला तरी वागायला अत्यंत साधू. अजुनही. गूनी माणूस. शिन्या कोपर्यात रडत बसला होता. हा शिन्या आहे तेलगू. पण ह्याला तेलगू निट येत नाही. घरचा कारभार मराठीतच. अन्याने मला सदाशिव बद्दल सांगीतले. तेव्हां आमच्या शाळेचे बांधकाम चालू होते, त्याचा विटा आल्या होत्या. सदाशिव फारच दंड पोरगा होता हे नक्की. तो लांबून नात्यात पण लागतो. तो त्या विटांपाशी मधल्या सुट्टीत खेळत होता. मी अन शिन्या तिकडे गेलो. त्याला काही बोलायची संधी द्यायच्या आत मी त्याला पोटात एक फाईट मारली आणी गचांडी धरली, म्हणंल, साल्या परत म्हणशील का काही? ओ ओ नाही नाही असे करत ते भांडन सूटले. शिन्याला कोणी काही म्हणने बंद केले. डायरेक्ट मारामारीची ती पहिली वेळ. नंतर बरेचदा कामाला आली. मी काही मारामार्या करनारा वा भांडनारा मूलगा न्हवतो. कधीच नाही. फक्त काही वेळा मात्र <span class="">बिनधास्त मारामार्या </span>केल्या आहेत. :)<br /><br /><br /><p>सज्जनहो, ह्या लिखानात व्याकरणाचा चूका भरपुर असन्याची दाट शक्यता आहे. मराठी वाचनाशीच माझा जास्त संबंध आला. व्याकरनाशी नाही. तो भागही मी पुढे लिहीनार आहेच. तो पर्यंत ... </p><p> </p><span class="">क्रमश: </span>Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-85445251672898131802008-12-11T13:05:00.006-06:002008-12-11T13:21:39.472-06:00इ सकाळ की पॉर्न साईटमिडीया, वृत्तपत्रे हे म्हणे लोकशाहीचा चौथा खांब असतात। त्यामूळे त्यांचावर समाज मन घडविन्याची जवाबदारी असते। थोड्या वेळा पुर्वी सकाळ च्या इ आवॄत्ती ला भेट दिल्यावर चूकून पोर्नो टाईप साईटला तर भेट दिली नाही ना? असे मनात आले. तूम्हीच प्रत्यक्ष बघा.<br /><br /><br /><a href="http://1.bp.blogspot.com/_j7YfpQOqbF0/SUFnspFLrAI/AAAAAAAAAAU/Ny4rIP1Qmkk/s1600-h/sakaL_1.bmp"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5278614254894427138" style="WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 248px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_j7YfpQOqbF0/SUFnspFLrAI/AAAAAAAAAAU/Ny4rIP1Qmkk/s320/sakaL_1.bmp" border="0" /></a><br /><div></div><div><br /><br /><a href="http://2.bp.blogspot.com/_j7YfpQOqbF0/SUFmHe5NFLI/AAAAAAAAAAM/Qj4VhrCBiuE/s1600-h/Sakal_Paper.GIF"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5278612516993045682" style="WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 232px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_j7YfpQOqbF0/SUFmHe5NFLI/AAAAAAAAAAM/Qj4VhrCBiuE/s320/Sakal_Paper.GIF" border="0" /></a><br /><br /><br />मान्यवर(?) वृत्तपत्रच असे वागू लागले तर समाजाला का दोष द्या?<br /><br />ह्या जाहिराती आवश्यक आहेत पण त्या फिल्टर देखील करता येतात हे सकाळच्या अक्कलशून्य इ संपादकाला कोण सांगेल?</div>Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-82373242805833163222008-12-08T11:40:00.001-06:002008-12-08T11:42:52.061-06:00२६-११, बुधवार, एक असाही योगायोग.<p>२६ नोव्हेंबर बुधवार रोजी मुंबई वर दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकचा हात असल्याचे आता पाकने मान्य करुन काही तास उलटले आहेत. त्या बद्दल मी इथे काहीही लिहीनार नाही.</p><p>पण ह्या दिवसाचा एक वेगळा योगायोग इथे मांडतोय. </p><p>नेमके ह्याच दिवशी इस्लामाबाद, पाकिस्थान इथे गृह सचिंवाची दहशतवाद व ड्र्ग ट्रॅफिकींग विरोधी आधी जी बैठक झाली होती त्याचा मसुदा संमंत केला गेला. त्याच दिवशी ते ऍटॅक्स झाले. ही वेळ नक्कीच त्यांनी डोळे उघडे ठेवून साधली असनार ह्यात वाद नाही.</p><p>ह्याबद्दल अजुन कुठल्याही पेपर मध्ये काही वाचले नाही. (कदाचित मिडीयाने ह्या स्टेटमेंट कडे दुर्लक्ष केले असावे ) किंवा असे काही स्टेटमेंट, बैठक आहे हेच त्यांना माहीती नसावे. </p><p>त्या स्टेटमेंटला ला <a href="http://meaindia.nic.in/pressrelease/2008/11/26js02.htm">http://meaindia.nic.in/pressrelease/2008/11/26js02.htm</a> <a href="http://meaindia.nic.in/pressrelease/2008/11/26js02.htm" rel="nofollow">इथे</a> वाचता येईल.</p><p>त्या नंतरच्या सोमवारी जेव्हां भारताने पाक मधिल अतिरेक्यांची यादी दिली तेव्हा पाकने ती धूडकावून लावली. ह्या स्टेटमेंटला काहीच अर्थ उरला नाही हे लगेच लक्षात आले. (मुद्दा ४).</p><p> </p><p> </p><p> </p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-34872249466902106322008-12-02T10:55:00.001-06:002008-12-02T10:55:46.982-06:00भारत पाक संबंध कसे असावेत? मतदान<p>भारत पाक संबंध.</p><p>मुंबई वरील हल्ल्यात पाकचा हात आहे हे सिध्द होतेच आहे. अश्या अनेक हल्यांमध्ये पाकचा हात असतोच. दर हल्ल्यानंतर आपण जाउ द्या म्हणून सोडून देतो. गेल्या ८ वर्षात अनेकदा आपनच पुढाकार घेउन दोन्ही राष्ट्रांमध्ये समझोता घडवुन आनतो ( मुशरफ बोलनी करायला येउन मध्येच न सांगता पळून जातात), बस सेवा, रेल्वे सेवा, पाकचे गायक, क्रिकेट इ इ आपण सर्व चालू करतो. पण ह्या समझोत्याचा फायदा तूम्हाला होताना दिसतो का?</p><p>ह्या पुढे भारताने पाक शी कसे संबंध ठेवायला पाहीजेत ह्यावर तूमचे मत द्या. मत देताना ते का दिले ते ही प्रतिक्रियेत देउ शकता. पर्याय बाजूला दिसत आहेत.</p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-70598588045925896542008-11-26T10:14:00.003-06:002008-11-26T10:18:04.531-06:00मंगेश पाडगावकरपाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.<br /><br />पाडगावकर मला तूमची आमची भेट कधी झाली हे खरच स्मरत नाही. तूम्ही लहानपनापासूनच भेटत गेलात. लहानपणी कधी तरी घरच्यांसोबत तूमचे "भावनांचा तू भुकेला रे" ऐकले आणी ते ऐकता ऐकता झोपी गेलो असे आमच्या मातोश्री सांगतात. ती जादू तूमची होती की लता मंगेशकरांची हे कळलेच नाही. तेव्हा ते वयच न्हवतें ते, मग आईने सांगीतले की अरे हे "आपले" पाडगावकरं. तिथे तूम्ही जे आपले झालात ते अजुनही आपलेच राहीलात.<br /><br />कळत्या वयातं तिच्या कडे पाहताना तूमचे लाजुन हासने अनं ची नेहमीच आठवन व्ह्यायची पाडगावकर. वाटायच पाडगावकर नसते तर माझ्या ह्या भावनांना कोणी ओळखले असते.<br /><br />पुढे कधी तरी जेव्हा सर्वांचे "प्रेम सेम नसते" हे ऐकले तेव्हां वाटल की, बास हेच माझे गाणें असनार. आणि आपले गाणे, आपणच गायचे हे तेव्हांच ठरवीले. मैत्रीनी बरोबर बसलो की "संथ निळे हे पाणी" आठवायचे. तेव्हां वाटायचे तो शुक्राचा तारा कधी संपूच नये. हेच हेच चित्र राहावें. नेहमीसाठी. पुढे जेव्हा मैत्रीनीने "मामा" बनवले तेव्हा तूमच्याच "अखेरचे येतील माझ्या" चा खरा अर्थ कळला.<br />पाडगावकर तूम्ही मला जळी-स्थळी भेटत असता. भरधाव वेगाने जेव्हा मी अमेरिकेतील रस्त्यांवरून गाडी हाकत असतो तेव्हा तूमच्याच कविता, भावगीत रुपाने माझ्या गाडीत वाजतात. त्या रस्त्यांचे भाग्य आहे पाडगावकर साहेब, कारण अशी वंदता आहे की आवाजाच्या लहरी खुप काळ तिथेच राहतात. कोणी जर पुढे मी गेलेल्या रस्त्यावरुंन ते लहरी ओळखायचे मशिन फिरवले तर त्याला रेडीओ लहरीत तूमची गाणी ऐकायला मिळतील व त्याचं जिवन सार्थकी लागेल.<br /><br />तूमचा जिवनाचा दृष्टीकोण काय ह्याचाशी आम्हा रसिकांना काही घेनेदेणे नाही, नसावे. आम्हाला फक्त तूमच्या कविता हव्यात, मग त्या मोरूच्या असोत वा बोलगाणी असोत. कारण अहो या जिवनावर प्रेमं करायला आम्हाला तूम्ही शिकवलत.<br /><br />तूम्ही आणि खळे काकांनी जे मला दिलयं, मला नाही वाटत त्यांच ऋण मी फेडू शकेन. तूम्हाला तूमच्याच कवितेने माझा "सलाम"<br />संथ निळे हे पाणी वर<br />शुक्राचा तारा<br />कुरळ्या लहंरीमधुनी<br />शिळ घालतो वारा<br />दुर कमान पुलाची<br />एकलीच अंधारी<br />थरथरत्या पाण्याला<br />कसले गुपीत विचारी<br />भरुन काजव्याने हा<br />चमके पिंपळ सारा<br />स्तिमीत होऊनी<br />तेथे अवचित थबके वारा<br />किरकीर रात किड्यांची<br />निरवतेस किनारी<br />ओढ लागुनी छाया<br />थरथरते अंधारी<br />मध्येच क्षितीजावरुनी<br />विज लकाकुन जाई<br />अन ध्यानस्थ गिरी ही<br />उघडुनी लोचन पाही<br />हळुच चांदने ओले<br />थिबके पाणावरुनी<br />कसला क्षन सोनेरी<br />उमले प्राणामधुनी<br />संथ निळे हे पाणी<br />वर शुक्राचा तारा<br />दरवळला गंधाने<br />मौनाचा गाभाराUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-87544666127306836952008-11-25T11:21:00.007-06:002008-11-25T15:14:04.108-06:00शाळा"शाळा" वाचून संपले पण नंतर मनात सुरु झालेली शाळा काही संपत नाही. मिलिंद बोकीलांनी प्रत्येकांचा शाळेतल्या आठवनीनां परत एकदा जागे केले.सुर्या, चित्र्या, जोश्या, बिबीकर, फावड्या हे फक्त कथेतील पात्रंच नसल्यामूळे आत पर्यंत भिडले. माझ्यातला जोश्या मला परत एकदा दिसला, तर माझ्यातल्याच अर्धवट मेलेल्या सुर्याची आठवन झाली. कधी कधी तो जागृत होतोच. :) शाळेतला प्रत्येक मुलगा कधी ना कधी तरी वरिल पात्रांपैकी एक असतोच.<br /><br />माझ्याही शाळेत असे प्रसंग घडलेले आहेत, कित्येकदा मीच त्यात होतो, त्यामूळे लहानपण परत एकदा आल्याचे जाणवले. मी क्रिकेट खुप चांगला खेळायचो, (असे मित्रांचे म्हणने) म्हणून आमच्या शाळेच्या टिम मध्ये तर होतोच. एकदा प्रॅक्टीस करताना कळले की एक नविन क्लब निर्मान झाला, तिकडे कॉलेजची मुलं खेळायची, त्यांचात चांगल्या लोकांना भरती करत आहेत हे कळले. मग आस्मादिक तिकडे गेले. तेव्हा मी आठवित होतो. ते आधी मला घ्यायलाच तयार न्हवते बाबापुता केल्यावर ये म्हणाले. मला पुर्ण सरावापैकी २/३ ओव्हर्स बॉलींग व थर्ड मॅनला शोभेल अशी फिल्डींग दिली. पण त्यांचा सरावाच्या वेळा ठराविक होत्या. त्यांच कॉलेज दुपारी संपायच व लगेच ते ग्राऊंडवर जायचे. आली का पंचाइत, कारण माझी शाळा दुपारी होती. मग काय दोन महीने मी रोज शाळेत जायला तर निघायचो पण पोचायचो ग्राऊंड वर आणि क्रिकेट खेळायचो. शाळेत डाउट येउ नये म्हणून मी बनावट पत्र शाळेत मुख्याध्यांपकांना पाठवून दिले की मला काविळ झालाय व मी शाळेत येउ शकनार नाही. यथावकाश घरी गोष्ट कळालीच व मुख्याध्यापकांकडे हजेरी लावावी लागली.<br /><br />पण महाराजा खरी गम्मत पुढे आहे. शाळेत गेल्यावर मी ही बनवून सांगीतले की मला रोज भाकरी आणि घट्ट वरन हेच खायला लागयाचे, हे सांगीतल्या बरोबरच सविता कुलकर्णीचा, तिच्या नकळत जोरात निघालेला प्ल्च स्सSSSस्स ऐकायला मिळाला आणि अस्मादिकांना कळले की सविताची आपल्यावर लाइन आहे. हे ऑफर्कोर्स अन्याने पटवून पटवून सांगीतले त्यामूळे अन्याची बहुतेक डिडी वरची लाइन क्लिअर होणार होती. कारण डिडी माझ्याशी फार बोलायची, आणि अन्या घुम्याला ते काही जास्त आवडायचे नाही. ह्या डिडीचाही जाम घोळ होता. ती होती 'अ' मध्ये आणि आम्ही क मध्ये पण ती असायची आमच्यातच. 'अ' वाले पोर बेखुब होते. तेव्हा 'क' बॅच आणि 'ड' बॅचच हुशार होती. १० वीत ड ची पोरगी मेरीटला आली. आनंद आणि अन्या शेजारीच राहायचे. डिडीवर आनंद मरायचा पण डिडीने त्याला भाव दिला नाही. डिडी नेहमी अन्याच्या घरी पडिक. ते जवळच राहायचे पण तरिही. अन्या बावळट निघाला, नंतर उगीच घाबरुन बहिन बहिन खेळत बसला आणि चान्स गमावला. नाहीतर अन्या आणि डिडी मस्त जोडी होती. माझी आवडती. आणि अन्यामूळे मी डिडीला सोडले, साल्या अन्यावर जाम राग आहे माझा.<br /><br />लाइन आहे हे कळाले पण पुढे काय? हा प्रश्न होता. आम्ही ना धड अन्यासारखे अतिहुशार ना धड केश्यासारखे पांडू त्यामूळे गोची झाली होती. दिवस असेच जात होते. त्या नसलेल्या काविळामूळे मला मात्र जोरदार भाव मिळाला होता. क्रिकेटची प्रगती शाळेमूळे खुंटली असली तरी शाळेच्या टिम मध्ये आपली वट होती. एके दिवशी मी मॅच मध्ये बॉलीग केल्यावर ९ वी ब मधल्या अभोर्यांने जोरात स्ट्रेट ड्राईव्ह मारला. तो अंभोर्या आणि बळवतं पाटील साले राक्षस होते. एक टप्पा पडून तो बॉल माझ्या गळ्यापाशी लागला. मला तो अडवताच आला नाही. मी जोरात पडलो व खेळ थोडावेळ थांबवावा लागला. मिल्याने नंतर सांगीतले की सविता मॅच बघता बघता रडायला आली होती. त्यामूळे मी आनंदीत झालो होतो पण अजुनही प्रगती न्हवतीच.<br />९ वी च्या गॅदरिंग मध्ये मी दोन वैयक्तीक बक्षिस मिळवली. एक वक्तृत्व स्पर्धेत व एक निबधंलेखण. सवडी व तिच्या मैत्रींनी मिळून एक पेन भेट दिला. मैत्रींनी फक्त नावालाच. सवडीचेच पैसे असनार, कारण तो चायनिज इंक पेन होता. तेव्हा ४० रु ला भेटायचा. त्या मैत्रीनी कशाला देतात काही? ति देखील सर्व कार्यक्रमात भाग घ्यायची त्यामूळे सोबत नेहमीच होती. आमच्या शाळेत मुलं मुली एकमेकांना बोलत, त्यांचा घरी जात. वा सोबत गृपने पिक्चरलाही जातं त्यामूळे काही प्रॉब्लेमच न्हवता.<br />एक वर्षभर असेच निघून गेले. सवडी बोलायची मात्र खुप. सारखी आपली बडबड बडबड. त्या चिमन्यांसारखी. १० वीला वह्यांची देवान घेवान घरी येने जाणे सारखे असायचे पण सांगायची वा पत्र द्यायची आपली व तिची डेरींग काही झाली नाही. तेव्हां गरजच वाटली नाही.<br />नंतर सविताच्या मैत्रीनेने मात्र एका दिवशी येउन सांगीतले की सविताला अन्याने सांगीतले. (च्यायला हा अन्या माझ्या जिवावर उठला होता कारण त्या काळात बहुतेक डिडी अन्यावर चिडली ) काहीतरी बंदोबस्त करन्यासाठी मग मी अग तसे काही नाही असे गडबडीत म्हणालो, पण तिला माझ्याक्डून बहुतेक 'हो' ऐकायचे होते. गडबड होगई. तिची चिडचिड झाली आणि तिने मला बोलायचे कमि केले किंवा अभ्यासामूळे तसे झाले. १० वी झाली आणि नंतर सविताचे आणि माझे कॉलेजच वेगळे झाले. १२ वी नंतर ती औरंगाबादला निघुन गेली.<br />आम्हा सर्व मित्रांची मैत्री अजुनही टिकून आहे. भेटल्यावर परत एकदा ह्या सर्व गप्पांची उजळनी वर नंतरच्या मैत्रींनीच्या गप्पा एकदा होतातच. आताही सविता भेटते पण फक्त आठवनीत. तिलाही मी नक्कीच भेटत असनार. असाच जुन्या मित्रांच्या शाळेच्या गप्पांत.Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1086943407208502606.post-1179646530983178372008-11-23T08:36:00.001-06:002008-11-25T15:12:29.316-06:00द ग्रेट मराठाजमराठ्यांचा म्हणजे आपला इतिहास वाचायची खुमखुमी प्रत्येकाला असते पण काय वाचावे हे न कळल्यामुळे आपण प्रकाशित कादंबर्यांनाच "इतिहास" समजतो. यात आपले मत पुर्वग्रहदुषीत होन्याचा फार संभव असतो. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की कादंबर्या वाचने चुकीचे आहे. ऐतीहासीक कादंबरी तो कालखंड त्या व्यक्तीच्या व लिहीनार्या व्यक्तीच्या दॄष्टीने सांगत असते आणि यात बर्याच गोष्टी दुर्लक्षीत होऊ शकतात. पण ह्या कादंबर्या सामान्य वाचकांना ईतिहास सांगू पाहातात हे ही नसे थोडके.<br />मला इतिहास समजावून घेताना खालील पुस्तकांची मदत झाली. ती यादी मी देत आहे. ही यादी पुर्ण नाही. (कारण पुर्ण होने शक्य नाही). यात मला आवडलेल्या, महत्वांचा पुस्तकांची नावे आहेत, ज्यातून वाचकाला मराठ्यांच्या इतिहासाचा मागोवा घेता येईल.<br /><br />कादंबर्या<br />छत्रपती शिवाजी<br />श्रिमान योगी.<br />छावा<br />संभाजी<br />छत्रपती संभाजी<br />राऊ<br />मंत्रावेगळा<br />पानिपत<br />स्वामी<br /><br />ऐतीहासीक पुस्तकांची यादी -<br />मराठी रियासत - गो.स.सरदेसाई ( जुने खंड १ ते ४५ पण ते नविन संपादित कमी केले आहेत)<br />इतिहास संग्रह - भाग १ ते ७, संपादक पारसनिस.<br />मराठ्यांचा इतिहास - खंड १ ते ५ , संपादक अ रा कुलकर्णी, ग ह खरे<br />शिंदेशाही इतिहासाची साधने - संपादक आनंदराव फाळके. ( पानिपत साठी उपयोगी)<br />मराठ्यांचा इतिहासाची साधने खंड १ ते ६ - संपादक वि का राजवाडे<br />ऐतीहासीक पत्रव्यवहार. गो.स.सरदेसाई, कृ पा कुलकर्णी<br />बाळाजी बाजीरावची रोजनिशी - संपादक पारसनिस.<br />मोगल मराठा संघर्ष - सेतु माधवराव पगडी<br />श्री छत्रपती शिवाजी - शेजवलकर<br />श्री छत्रपती महाराजयांचे चिकीत्सक चरित्र्य - वा सि बेंद्रे<br />श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र्य - वा सि बेंद्रे<br />राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे.<br /><br />ईंग्रजी पुस्तकं<br />A History of the Mahrattas Volume 1, 2 and 3 James Grant Duff ( अमॅझॉन वर हे अजुनही मिळते)<br />The Marathas 1600-1818 -The New Cambridge History of India by Stewart Gordon<br />History of Aurangjeb - Sir Jadunath Sarkar<br />Military History of India - Sir Jadunath Sarkar<br />Rise of the Maratha power, and other essays, by M.G. Ranade<br />Marathas and the Marathas country by A. R Kulkarni<br />The second Maratha campaign, 1804-1805: Diary of James Young, officer, Bengal Horse Artillery, and twice sheriff of Calcutta by James Young<br />ही काही पुस्तक। यातील बरिच सहज उपलब्ध नसतात तर काही महत्वाची अजुनही प्रकाशनात आहेत। अप्पा बळवंत (पुणे) मध्ये बहुतेक सर्वच मिळतील पण काही अमेरिकेतही सहज मिळू शकतील. ( जसे ग्रांट डफ). वरिल पुस्तके ही खास करुन मराठ्यांचा इतिहासाचीच आहेत, ह्यात मी केम्ब्रींज हिस्ट्री ऑफ ईंडिया सारखी प्रकाशने टाळली आहेत कारण ती पुर्ण भारतासाठी आहेत.<br /><br /><br />ही यादी निश्चीतच अपुर्ण आहे पण इतिहास वाचकासांठी भरपुर होईल. मला स्वतःला मराठी रियासत व मराठ्यांचा इतिहास - खंड १ ते ५ , संपादक अ रा कुलकर्णी, ग ह खरे हि दोन पुस्तके जास्त आवडतात कारण ह्यात भरपुर माहीती सोप्या व सहज शैलीत दिली आहे.Unknownnoreply@blogger.com3