टेन्शन नै लेने का मामू

1

Written on 2:35 PM by केदार जोशी

ए, अरे थांब, थांब। छ्या हा माणूस ह्या जन्मात कधी ऐकनार नाही. कितीदा सांगितले की मीठ वरुन नको घेऊस? ऐकनार आहेस की नाही?
अगं पण, मी थोडेच घेतोय आणि मला माझी स्वतःची काळजी नाही का?
मोठा आलाय काळजी घेणारा, नाहीतर आज ही वेळ आलीच नसती.
ही वेळ म्हणजे काय? च्यायला, माझ्याच घरात, माझ्याच पैशाने मला मीठ खायला बंदी म्हणजे फार झाले.
ही बंदी आधी पासून असती तर मला सारख ओरडाव लागलं नस्त.
(मनात, आता बायको माझ्या घरच्यांचा उध्दार करणार) पण तू कशाला ओरडतेस. अगं थोडंसच घेतोय की.
घे. घे. अस कर ही पुर्ण मिठाची बाटली मी तुला देते.
अगं पुर्ण नाही, थोडेच दे.
(खस्सकन माझे ताट ओढन्यात येते आणि मी चामत्कारिक रित्या इकडे तिकडे पाहतोय.)
तुझ्या आईनेच तुला लाडावुन ठेवले त्यामुळेच झाले हे.
आईचा ह्यात काय संबंध. गेले १५ वर्ष मी आई पासुन लांब राहतोय.
त्यांचाच संबंध आहे. सारख घरात तिखटाचे खाणे तुमच्या घरी. आणी मीठही सढळ.
काहीही काय? च्यायला तुम्ही कधी चमचमीत खाल्ल नाही त्याला आम्ही काय करनार?
आलासना परत आम्ही वर.
दहा वर्षे होत आलीत पण 'आम्हीच' ..... .... ....
प्च्च। प्च्च. अगं तसे नाही काही, मी आपल उदा दिली. ( भाड्यांची आदळ आपट होण्यास आता कधीही सुरु होउ शकते).

लोकहो, हा आजकालचा रोजचा संवाद झालाय. म्हणजे सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस ह्या मिठाने माझे घोडे मारलेय.

झाल काय की ( थोडा फ्लॅशबॅक) त्या दिवशी सॅम्स कल्ब मध्ये बी पी चेक करन्याचे मॉनीटर दिसले म्हणून अस्मादिकांनी मोठ्या स्टाईलीत त्या मशीनमध्ये आपला हात घातला। तर अहो आश्चर्यम, १४७ / ९८ असे रिडींग आले. मी पटकन ते इरेझ करनार इतक्यात सौ तिथे आली आणी तिने हे आकडे पाहिल्यावर बडबड सुरु केली. मग परत दुसरेंदा रिडींग घे अशी आज्ञा आल्यावर मी परत सावरुन श्वासाच्या गतिवर नियत्रंन ठेवत परत एकदा सर्व सोपस्कार पार पाडले. परत एकदा १३२ / ९६ असे रिडींग आले. मी सावरुन म्हणालो, "अंग,बघ हे मशीनच फॉल्टी होत बहुतेक"

छ्या। अरे रिडींग मध्ये १० ते १५ पर्यंत फरक पडू शकतो असे मशीनवरच लिहीलय की. इती सौ.
बरं, एवढ काही खास नाही मग। ते ९६ परत खाली जाईल आणी नॉर्मल वर येईल.
काही येत नाही। तुझी लाईफस्टाईल पाहिलीस का?
म्हणजे? आता वाइफस्टाईलचा काय संबंध.
वा? अरे .ला.ला.
(सावरुन) हो अग ला च.तुला काही म्हणायची हिंमत आहे का माझ्यात. ती लग्नाच्या दिवशी पर्यंतच होती.

(मनात : झक मारली आणी त्या यंत्रात हात घातला. आता ही बाई ते समोसे, कचोर्‍या बंद करनार, ठिके रात्री ऑफीसमधून येतानाच समोसा वैगरे खाउन यायचे आता, उगीच कटकट नको आणी ते ईंडो चायनिज आता थोडे कमी केले असा आभास तरी निर्मान करायला पाहीजे. )

काय म्हणलास?
काही नाही. आता जरा लक्ष ठेवावे लागेल खान्याकडे.

कट टू
मित्राच्या घरी गेलो होतो। त्याचा रुटीन चाचनीचा रिपोर्ट तो मला सांगत होता. कॉलेस्ट्रॉल वाढलेय रे. आता भात बंद करतो मी - मित्र
हो रे, तुला लक्ष द्यावे लागेल जरा खाण्याकडे.
अन तुला? - आमच्या सौ.
मला? मला काय झालयं।
अरे, ह्याने सॅम्स मध्ये बी पी चेक केले होते तर तिथे १४५-९८ अश्या टाईपच्या त्याचा रिडींग होत्या.
१३२
त्याने काय फरक पडतो?
आँ.
म्हण्जे १०-२० इकडे तिकडे असे लिहीलेय तिथे
पण केदारचा रिपोर्ट दोन महिन्यांपुर्वी तर नॉर्मल होता की। रोज १२-१४ मैल सायकल चालवतो म्हणे तो. (तेल ओतने म्हणतात ते हे.)
अब्बे ये। म्हणे नाही खरच. रोज व्यायाम वैगरे करतो मी.
अरे पण तू सगळे अशातच चेक केले होते की अन बी पी, कॉलेस्ट्रॉल सर्व नॉर्मल आले होते की. तू डॉक्टर कडे जाउन ये. - मित्र

कट थ्री
डॉक्टर कडे भेट दिली. तिथेही खालच्या आकड्याने घोळ घातलाच. तुम्ही ड्रिंक्स कमी करा. - मी घेत नाही.सिगारेट - नाही ती पण नाही.व्यायाम करा. अहो, पण मी रोजच करतो.झोप येते का? हो मग खर तर काही कारण नाही तुम्हाला हायपरटेन्शनची. (मी गप्प)
अस करा ह्या गोळ्या १० दिवसांनंतर चालु करू. पण तो पर्यंत तुम्ही रोज सकाळी व संध्याकाळी बी पी चेक करा। ते चेक करायचे यंत्र आणायला मला ५० डॉलरचा भुर्दंड पडला तो वेगळा.

त्या बी पी च्या तर. आयला ह्याने माझे मिठ खाणेच बंद केले आहे. रोज सकाळ संध्याकाळ सध्या ते मॉनीटर चालू आहे. आणी बी पी च्या नावाखाली सप्पक खाणे सुरु झाले आहे. एवढेच नाही तर आता माझ्या सारख्या ऍक्टीव्ह माणसाला स्टेज टू बी पी होत असल्यामुळे ( अजुन झाला नाही, पण आकडे तसे दाखवतात, त्याला मी काय करु) रोज घरच्यांचे फोन, मित्रांचे सल्ले ह्यामूळे जिव मेटाकुटीला आलाय.

ते रिडींग तर काही दिवसात नॉर्मलला येईलच. पण तो पर्यंत एकच मंत्र, " टेन्शन नै लेने का मामू"

धर्म म्हणजे काय?

2

Written on 7:46 PM by केदार जोशी

धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का?
पाहिलंत किती प्रश्न पडले ते?


वेबस्टर नुसार धर्माची व्याखा अशी केली आहे. "a strong belief in a supernatural power or powers that control human destiny"


ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते। धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.


हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.
"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"
विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.
जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो। जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.


कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात।

१ त्या धर्माचे तत्वज्ञान

२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड
नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.
वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.
आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.
देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.
विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, ""Religion is the manifestation of the divinity already within man।" And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness".


वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.
उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्‍या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही। पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्‍या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.


धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही। पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.


ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता

मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि

वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी:

अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि

सत्यं वदिष्यामि तन्मामवतु

तद्वक्तारम्वतु अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम्

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:


अर्थात माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.
वेदांनुसार ब्रह्म म्हणजे काय हे पुढे कधीतरी ..

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट

0

Written on 1:03 PM by केदार जोशी

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट


'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय. विचार करा यातून बाहेर पडायला हवय ना! काही करायचं तर आहेच मग आपला मार्ग आपणच शोधायला लागूयात, काय म्हणता? आपण एकत्र येऊन काही तरी नक्कीच करु शकतो. आपला देश बदलायला आपण हातभार लावणार नाहीतर कोण, युनो? नक्कीच नाही. ह्यावर विचार करायला हवा. देश बदललेला सर्वांना हवाय पण वेळ व पैसा द्यायची किती लोकांची तयारी असते? आपण चार लोकं एकत्र आल्यावर सर्व काही बदलेल, आलबेल होईल अशा भ्रमात राहून चालणार नाही, पण निदान चार गरजू लोकांच्या आयुष्यात आपण नक्कीच बदल घडवू शकतो, त्यांना त्यांचे जीवन घडविण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो. ती चार लोक अजून दहाजणांचे जीवन घडवू शकतील आणि ती दहा अजून वीस .. आणि हा क्रम अव्याहत चालू राहू शकेल. आपल्यापैकी बरेच सुस्थितीत आहेत, त्यांच्या सामाजिक जाणीवा अजून जिवंत आहेत, काहीतरी करायची तळमळ आहे पण परिस्थिती, व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदार्या,परदेशातील वास्तव्यामुळे येणार्या भौगोलिक मर्यादा अशा अनेक कारणांमुळे इच्छा असूनही आपण कुठलीही मदत करु शकत नाही. भारतात रहाणार्या कित्येकांची प्रत्यक्ष तसेच आर्थिक योगदान देण्याची तर परदेशातील लोकांची आर्थिक मदत करण्याची क्षमता असते आणि इच्छाही. दरवेळी जेव्हा मदत करण्याचे आवाहन केले जाते तेव्हा हे लोक पुढे होऊन मदत देखील करतात, पण पुढे त्या पैशांचे काय होते, कुठल्या संस्थेला ते पैसे जातात त्यांचा विनियोग कशाप्रकारे केला जातो? असे बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. ह्यामुळे बरेच जण तर 'मी दुसर्यांना पैसे देणार नाही कारण पुढे त्याचे काय होते हे मला माहिती नाही, कदाचित लोक मदतीच्या नावाखाली फसवत देखील असतील, सत्पात्री दान होणार नाही म्हणून मी मदत करणार नाही' ह्या मताचे बनतात. अनेकजण सुरुवात तर जोरात करतात पण पुढे कालौघात ह्या गोष्टींचा विसर पडतो कारण आपण स्वत: अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. ह्यावर उपाय शोधायला हवा. आजच्या इंटरनेटच्या काळात आपल्या सर्वांच्या ओळखी ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जास्त होतात, त्यामुळे आम्हीही ह्याच माध्यमातून एका अनोख्या मदत गटाची, फंडाची रचना करु पाहतोय. ह्या संकल्पनेचे स्वरूप पुढे ठेवायचा हा प्रयत्न --

मदतगटाच्या निर्मितीचे उद्देश:


पुढे काय?


हे सर्व वाचन्यासाठी व सुंपथ बद्दल अधिक अधिक माहीतीसाठी http://supanth.blogspot.com इथे भेट द्या.
हा उपक्रम चालु करनार्‍यांपैकी मी एक आहे.
You have to be part of the system, to chage it. तूम्हीही सहभागी व्ह्या.
संपर्कासाठी supant.madatagut@gmail.com वर संपर्क साधता येइल.

अहं ब्रम्हास्मि

0

Written on 2:38 PM by केदार जोशी

मय्येव सकलं जातं मयि सर्वं प्रतिष्ठितम

मयि सर्वं लयं याति तदब्र्म्हाद्वयमस्म्यहम १९

माझ्यातच सर्व गोष्टींचा जन्म आहे, माझ्यातच त्यांचे अस्तित्व आहे आणी माझ्यातच ते सर्व विलीन होतात. मीच तो "ब्राम्हण" आहे.

अणोरणीयानहमेव तद्वनमहानहं विश्वमहं विचित्रम

पुरातनोSहं पुरूषोSहमीशोहिरण्यमयोSहं शिवरुपमस्मि २०


अर्थात
अणूपेक्षाही लहान असनारा मी ह्या ब्रम्हांडापेक्षाही मोठा आहे। मीच हा विश्वविधाता आहे, मीच तो पुरातन पुरूष आहे, ज्याचा हातात सर्व सत्ता आहे. कारण मी च तो पवित्र शिव आहे.



अपाणणिपादोहम्चिन्त्यशक्ति:पश्चाम्य्चक्षु: स श्रॄणोम्यकर्णः

अहं विजानामि विविक्तरुपोन चास्ति वेत्ता मम चचित्सदाहम २१


मला हात आणी पाय नाहीत। मी डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो. मलाच सर्व ज्ञान आहे पण माझे अस्तित्व (ज्ञान) कोणालाही नाही कारण मी च ते पवित्र ज्ञान वा अंतिम सत्य आहे.



वेदैरनेकैरहमेव वेद्योवेदान्तकृद्वेदविदेव चाहम

न पुण्यपापे मम नास्ति नाशोन जन्म देहेन्द्रिय बुध्दीरस्ति २२



सर्व वेद हे "मी" कोण आहे हे सांगन्यासाठीच निर्मान केलेले आहेत वेद, उपनिषीद व वेदान्त हे मीच निर्मान केले आहेत. मला अदि नाही ना अंत, माझा जन्मही झाला नाही वा मॄत्यूही होणार नाही.



न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च

एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम २३

समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति

शुध्दं परमात्मरुपम २४


अर्थात
माझ्यासाठी भूमी नाही ना ही पाणी, अग्नी वा वायू. हे काहीही नाही. मला अस्तित्व आहे आणी अस्तित्व नाहीही कारण मीच परमात्मा आहे.
वरिल श्लोक हे कैवल्योपनिषादातून घेतले आहेत.
काल परवा नेट वर भटकताना सोनल देशपांडेच्या ब्लॉग वर निर्वाणषटका वरिल विवेचन वाचले. सोनल धन्यवाद. बहुत दिनांपासुन वरिल श्लोक लिहून काढायचे होते पण ते जमले न्हवते. आजच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काही तरी वेगळे लिहायला मिळाले.


वरवर पाहाता ह्या ओळी काहीही जास्त सांगत नाहीत. पण खोलात जाउन विचार केला तर त्याचा अर्थ सांगायला पाने अपुरी पडतील म्हणून मी थोडक्यात लिहीले. तेवढी माझी योग्यता नाही.