धर्म म्हणजे काय?

2

Written on 7:46 PM by केदार जोशी

धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का?
पाहिलंत किती प्रश्न पडले ते?


वेबस्टर नुसार धर्माची व्याखा अशी केली आहे. "a strong belief in a supernatural power or powers that control human destiny"


ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते। धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.


हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.
"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"
विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.
जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो। जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.


कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात।

१ त्या धर्माचे तत्वज्ञान

२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड
नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.
वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.
आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.
देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.
विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, ""Religion is the manifestation of the divinity already within man।" And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness".


वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.
उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्‍या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही। पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्‍या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.


धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही। पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.


ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता

मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि

वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी:

अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि

सत्यं वदिष्यामि तन्मामवतु

तद्वक्तारम्वतु अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम्

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:


अर्थात माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.
वेदांनुसार ब्रह्म म्हणजे काय हे पुढे कधीतरी ..

अहं ब्रम्हास्मि

0

Written on 2:38 PM by केदार जोशी

मय्येव सकलं जातं मयि सर्वं प्रतिष्ठितम

मयि सर्वं लयं याति तदब्र्म्हाद्वयमस्म्यहम १९

माझ्यातच सर्व गोष्टींचा जन्म आहे, माझ्यातच त्यांचे अस्तित्व आहे आणी माझ्यातच ते सर्व विलीन होतात. मीच तो "ब्राम्हण" आहे.

अणोरणीयानहमेव तद्वनमहानहं विश्वमहं विचित्रम

पुरातनोSहं पुरूषोSहमीशोहिरण्यमयोSहं शिवरुपमस्मि २०


अर्थात
अणूपेक्षाही लहान असनारा मी ह्या ब्रम्हांडापेक्षाही मोठा आहे। मीच हा विश्वविधाता आहे, मीच तो पुरातन पुरूष आहे, ज्याचा हातात सर्व सत्ता आहे. कारण मी च तो पवित्र शिव आहे.



अपाणणिपादोहम्चिन्त्यशक्ति:पश्चाम्य्चक्षु: स श्रॄणोम्यकर्णः

अहं विजानामि विविक्तरुपोन चास्ति वेत्ता मम चचित्सदाहम २१


मला हात आणी पाय नाहीत। मी डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो. मलाच सर्व ज्ञान आहे पण माझे अस्तित्व (ज्ञान) कोणालाही नाही कारण मी च ते पवित्र ज्ञान वा अंतिम सत्य आहे.



वेदैरनेकैरहमेव वेद्योवेदान्तकृद्वेदविदेव चाहम

न पुण्यपापे मम नास्ति नाशोन जन्म देहेन्द्रिय बुध्दीरस्ति २२



सर्व वेद हे "मी" कोण आहे हे सांगन्यासाठीच निर्मान केलेले आहेत वेद, उपनिषीद व वेदान्त हे मीच निर्मान केले आहेत. मला अदि नाही ना अंत, माझा जन्मही झाला नाही वा मॄत्यूही होणार नाही.



न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च

एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम २३

समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति

शुध्दं परमात्मरुपम २४


अर्थात
माझ्यासाठी भूमी नाही ना ही पाणी, अग्नी वा वायू. हे काहीही नाही. मला अस्तित्व आहे आणी अस्तित्व नाहीही कारण मीच परमात्मा आहे.
वरिल श्लोक हे कैवल्योपनिषादातून घेतले आहेत.
काल परवा नेट वर भटकताना सोनल देशपांडेच्या ब्लॉग वर निर्वाणषटका वरिल विवेचन वाचले. सोनल धन्यवाद. बहुत दिनांपासुन वरिल श्लोक लिहून काढायचे होते पण ते जमले न्हवते. आजच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काही तरी वेगळे लिहायला मिळाले.


वरवर पाहाता ह्या ओळी काहीही जास्त सांगत नाहीत. पण खोलात जाउन विचार केला तर त्याचा अर्थ सांगायला पाने अपुरी पडतील म्हणून मी थोडक्यात लिहीले. तेवढी माझी योग्यता नाही.